शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

आनंद तरंग: भयाची पत्रके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 03:37 IST

विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो.

विजयराज बोधनकर

एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये पांप्लेट नावाचा लघुचित्रपट पाहिला. अंधश्रद्धेवर आधारित होता. एका छोट्याशा शाळकरी मुलाच्या हाती एक थोराड व्यक्ती एक पत्रक देतो आणि निघून जातो. त्या पत्रकावर मजकूर असा असतो की, हे पत्रक अमूक अमूक देवाचे आहे. या पत्रकाच्या शंभर कॉपी काढून लोकांमध्ये वाटल्यात तर तुमचे संकट दूर होईल, न होणारी कामे होतील आणि घरात सुख नांदेल, परंतु शंभर पत्रके न वाटल्यास वाईट घटना, संकटे, आप्तांचा मृत्यू येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हे वाचून तो शाळकरी मुलगा अर्धमेला होऊन जातो. त्याच्याकडे पैसे नसतात. त्याचे वडील देव देवस्की मानणारे नसतात. त्या मुलाची घुसमट आणि आताचा समाज याचं उत्तम चित्रण त्या चित्रपटात केलं आहे. शेवटी तो मुलगा ते पत्रक एका आंधळ्या म्हाताऱ्याच्या हाती देऊन त्या वचनातून मुक्त होतो़ या विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो. ग्रामीण भागात आजही आणि कालही बुद्धिवान युवावर्ग होता आणि आहे. परंतु भोळसट मार्गात अडकलेली पाऊले त्यांनी शैक्षणिक आणि कल्पक मार्गाकडे वळवली तर अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा आपोआपच नायनाट होईल. शहरी भागातही अशा पद्धतीचं भय आहे. परंतु त्याचं प्रमाण तितकंसं नाही. देव कधीही कुणावर संकटं लादत नसतो. ईश्वरावरची श्रद्धा म्हणजेच कर्मावरची श्रद्धा असते. ज्याने निकोप आणि सुदृढ आयुष्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश करीत असतं. म्हणूनच गाडगेबाबांनी शिक्षणाला देवत्वाचं प्रमाणपत्र दिलं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक