शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
3
नेपाळमधून खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
4
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
5
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
6
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
7
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
8
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
9
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
10
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
11
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
12
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
13
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
14
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
15
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
16
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
17
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
18
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
19
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
20
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: भयाची पत्रके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 03:37 IST

विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो.

विजयराज बोधनकर

एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये पांप्लेट नावाचा लघुचित्रपट पाहिला. अंधश्रद्धेवर आधारित होता. एका छोट्याशा शाळकरी मुलाच्या हाती एक थोराड व्यक्ती एक पत्रक देतो आणि निघून जातो. त्या पत्रकावर मजकूर असा असतो की, हे पत्रक अमूक अमूक देवाचे आहे. या पत्रकाच्या शंभर कॉपी काढून लोकांमध्ये वाटल्यात तर तुमचे संकट दूर होईल, न होणारी कामे होतील आणि घरात सुख नांदेल, परंतु शंभर पत्रके न वाटल्यास वाईट घटना, संकटे, आप्तांचा मृत्यू येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. हे वाचून तो शाळकरी मुलगा अर्धमेला होऊन जातो. त्याच्याकडे पैसे नसतात. त्याचे वडील देव देवस्की मानणारे नसतात. त्या मुलाची घुसमट आणि आताचा समाज याचं उत्तम चित्रण त्या चित्रपटात केलं आहे. शेवटी तो मुलगा ते पत्रक एका आंधळ्या म्हाताऱ्याच्या हाती देऊन त्या वचनातून मुक्त होतो़ या विज्ञानयुगात असली आंधळ्या भयाची पाळंमुळं सर्वत्र खोलवर शिरलेली आढळतात. अजूनही देवभयापासून समाज मुक्त नाही. त्यामुळेच मानसिक ऊर्जेचा प्रवाह हा अनिष्ट प्रथेत वाया जाताना दिसतो. ग्रामीण भागात आजही आणि कालही बुद्धिवान युवावर्ग होता आणि आहे. परंतु भोळसट मार्गात अडकलेली पाऊले त्यांनी शैक्षणिक आणि कल्पक मार्गाकडे वळवली तर अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा आपोआपच नायनाट होईल. शहरी भागातही अशा पद्धतीचं भय आहे. परंतु त्याचं प्रमाण तितकंसं नाही. देव कधीही कुणावर संकटं लादत नसतो. ईश्वरावरची श्रद्धा म्हणजेच कर्मावरची श्रद्धा असते. ज्याने निकोप आणि सुदृढ आयुष्य माणसाच्या आयुष्यात प्रवेश करीत असतं. म्हणूनच गाडगेबाबांनी शिक्षणाला देवत्वाचं प्रमाणपत्र दिलं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक