शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

आनंद तरंग - शास्त्रग्रंथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 1:50 AM

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे

सौरभ कुलकर्णी

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान त्यात असते. जीवनशैलीवर त्याचा प्रभाव असतो. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे श्रीमद्भगवदग्ीतेलाही ते एक शास्त्र आहे, असे म्हटले जाते. कारण यात भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांच्या द्वारा समजावून सांगितली आहे. जीवनात अनेकदा कठीण वाटणारे प्रश्न पडतात. भगवद्गीतेत त्याची उत्तरे सापडतात अन् आपला मार्ग मोकळा होतो. म्हणून श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे जीवनातील प्रश्नांवर तोडगा देणारे तीन मार्ग सांगण्यासाठी केली आहे.

पहिल्या अध्यायाचा विचार केल्यास त्यात उदाहरण असणारा अर्जुन स्वत:चा स्वभावत: असणारा जो क्षत्रिय धर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त झालेला असला तरीही समोर आप्तस्वकीय, अगदी जवळचे लोक आहेत हे त्याने पाहिले तेव्हा त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली. स्वकीयांसोबतच युद्ध कसे करायचे, त्यांचा पराभव करण्यासाठी कसे लढायचे, असे प्रश्न त्याला पडले, असे पहिल्या अध्यायात सांगितलेय. रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असे वाटू शकते की, मी जे करीत आहे ते अगदी योग्य करतो आहे का अयोग्य? तेव्हा आपला उद्देश योग्य असेल व तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गात कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये. मात्र, तसे करणे काही अपरिहार्य कारणांमुळे होत असेल तर तेवढ्या गोष्टींसाठी त्याची व ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आपण आयुष्यभर करीत राहणे, हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक