शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आनंद तरंग: शांती परते नाही सुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:08 IST

दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत.

प्रा. शिवाजीराव भुकेले

शांती नावाच्या स्फटिकगृहातील डोलणारे अजातशत्रू दीपक म्हणजे संत होत. समता, ममता आणि शांती ही संताच्या जीवनातील त्रिवेणी होती. संसारात घडणाऱ्या नाना घटनांनी संताच्या मनाची शांती कधी विचलित झाली नाही. भ्रांतक्रांत व गलितगात्र झालेल्या समाजाला सन्मार्गाचा व सुसंस्काराचा उजेड दाखविण्याचे काम शांती नावाचा सद्गुण करतो. नदीचा प्रवाह हा जसा स्वाभाविकपणे सागराकडे जाण्यासाठी प्रवाहित होतो, सूर्यफूल जसे सूर्याच्या तेजाकडे तोंड करून बसते अन् आपल्या पिवळ्या धम्मक सगुण रूपाचा साक्षात्कार देते, चकोर जसे चंद्राकडे अमृतकणाची आस करण्यासाठी आपली चोच उघडून बसतात तसे संत भगवंताकडे शांत व संयमी जीवनाचे दानङ्कमागतात. कारण शांती हेच जगातील सर्वोत्तम सुख आहे. शांत-शांत जलाशयात जसे चंद्रासहीत स्वत:चे प्रतिबिंंब न्याहाळता येते अगदी तसेच शांत-शांत मनरूपी सरोवरात जीवत्वाचे भाव गळून जातात आणि शिवत्वाकडे वाटचाल सुरूहोते. निंदा-अवज्ञा-उद्धटपणा यांचे अडथळे जीवनरूपी रस्त्यावर वारंवार येणारच; पण या अडथळ्यांना पार करून जो अडथळा आणणाऱ्यांचे अहित चिंतित नाही तो शांतीचा प्रत्यक्ष पुतळा असतो. दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत. कारण मानसिक शांती हाच तर संताचा स्थायीभाव होता. शरीराच्या पसाºयातील आपलाच हात अन् पाय आपल्याच अंगावर आदळला म्हणून आपण त्याला कधी कापून टाकत नाही. समाजात अगदी तसेच आहे म्हणून संत जगाचे आघात अगदी शांतपणे सहन करतात. शांती हेच परमसुख आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात -

शांती परते नाही सुख। येर आवघेचि दु:ख।म्हनवूनि शांती घरा। उतराल पैलतीरा।खवळलीया कामक्रोधी। अंगी भरती आधीव्याधी।तुका म्हणे विविध ताप। जाती मग आपोआप॥वैषयिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या आजच्या भयग्रस्त जीवनात शांती परते सुख नाही. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता धोक्यात येत आहे. आंचन, कांचन, करवंदीने भरलेला, ऋषीमुनींच्या शांतीघोषाने दुमदुमणारा आपला भारत देश चहूबाजूने अशांत होत आहे. अशा वेळी धीर धरा रे, धीरापोटी शांती उपजेल गोमटी असा संदेश देणाºया संत विचारांची आज खरी गरज आहे. जेथे शांती नसते तेथे संसारिक असो वा पारमार्थिक असो अशा शांत-सुखाला कधी थाराच मिळू शकत नाही. शांततेच्या अभावाने आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळलेल्या जगात हिंसेच्या आणि भयाच्या नरसंहारक लाटा उसळत असतात. म्हणूनच विचारवंत आजही संदेश देत आहेत की, आता युद्ध नको बुद्ध हवा. समाज जीवनाला अधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक तापांनी तप्त केले आहे त्यावर आपल्या हृदयस्थ शांतीचेच शिंंपण करायला हवे. जगात इतर प्रत्येक विषयांचा अंत दु:खांत आहे; पण शांतीचा अंत मात्र सुखांत आहे. परंतु, आज इतर प्राणिमात्रांनी माणसाचा शत्रू होण्यापेक्षा माणूसच झालाय माणसाचा वैरी. दुसºयाला नष्ट करण्याच्या कुविचारांचे गिधाडे आणि घारी आकाशात नव्हे, तर माणसाच्या डोक्यात घिरट्या घालत आहेत. जिकडे-तिकडे हिंंसेच्या ज्वाला उफाळत आहेत. मानवतेची राख-रांगोळी होत आहे. अशा वेळी शांतीला परब्रह्म मानणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -शांती तोचि समाधान। शांती तोचि ब्रह्मज्ञान ।शांती तोचि ब्रह्म पूर्ण। सत्य जाण उद्धवा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक