शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: शांती परते नाही सुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:08 IST

दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत.

प्रा. शिवाजीराव भुकेले

शांती नावाच्या स्फटिकगृहातील डोलणारे अजातशत्रू दीपक म्हणजे संत होत. समता, ममता आणि शांती ही संताच्या जीवनातील त्रिवेणी होती. संसारात घडणाऱ्या नाना घटनांनी संताच्या मनाची शांती कधी विचलित झाली नाही. भ्रांतक्रांत व गलितगात्र झालेल्या समाजाला सन्मार्गाचा व सुसंस्काराचा उजेड दाखविण्याचे काम शांती नावाचा सद्गुण करतो. नदीचा प्रवाह हा जसा स्वाभाविकपणे सागराकडे जाण्यासाठी प्रवाहित होतो, सूर्यफूल जसे सूर्याच्या तेजाकडे तोंड करून बसते अन् आपल्या पिवळ्या धम्मक सगुण रूपाचा साक्षात्कार देते, चकोर जसे चंद्राकडे अमृतकणाची आस करण्यासाठी आपली चोच उघडून बसतात तसे संत भगवंताकडे शांत व संयमी जीवनाचे दानङ्कमागतात. कारण शांती हेच जगातील सर्वोत्तम सुख आहे. शांत-शांत जलाशयात जसे चंद्रासहीत स्वत:चे प्रतिबिंंब न्याहाळता येते अगदी तसेच शांत-शांत मनरूपी सरोवरात जीवत्वाचे भाव गळून जातात आणि शिवत्वाकडे वाटचाल सुरूहोते. निंदा-अवज्ञा-उद्धटपणा यांचे अडथळे जीवनरूपी रस्त्यावर वारंवार येणारच; पण या अडथळ्यांना पार करून जो अडथळा आणणाऱ्यांचे अहित चिंतित नाही तो शांतीचा प्रत्यक्ष पुतळा असतो. दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत. कारण मानसिक शांती हाच तर संताचा स्थायीभाव होता. शरीराच्या पसाºयातील आपलाच हात अन् पाय आपल्याच अंगावर आदळला म्हणून आपण त्याला कधी कापून टाकत नाही. समाजात अगदी तसेच आहे म्हणून संत जगाचे आघात अगदी शांतपणे सहन करतात. शांती हेच परमसुख आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात -

शांती परते नाही सुख। येर आवघेचि दु:ख।म्हनवूनि शांती घरा। उतराल पैलतीरा।खवळलीया कामक्रोधी। अंगी भरती आधीव्याधी।तुका म्हणे विविध ताप। जाती मग आपोआप॥वैषयिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या आजच्या भयग्रस्त जीवनात शांती परते सुख नाही. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता धोक्यात येत आहे. आंचन, कांचन, करवंदीने भरलेला, ऋषीमुनींच्या शांतीघोषाने दुमदुमणारा आपला भारत देश चहूबाजूने अशांत होत आहे. अशा वेळी धीर धरा रे, धीरापोटी शांती उपजेल गोमटी असा संदेश देणाºया संत विचारांची आज खरी गरज आहे. जेथे शांती नसते तेथे संसारिक असो वा पारमार्थिक असो अशा शांत-सुखाला कधी थाराच मिळू शकत नाही. शांततेच्या अभावाने आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळलेल्या जगात हिंसेच्या आणि भयाच्या नरसंहारक लाटा उसळत असतात. म्हणूनच विचारवंत आजही संदेश देत आहेत की, आता युद्ध नको बुद्ध हवा. समाज जीवनाला अधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक तापांनी तप्त केले आहे त्यावर आपल्या हृदयस्थ शांतीचेच शिंंपण करायला हवे. जगात इतर प्रत्येक विषयांचा अंत दु:खांत आहे; पण शांतीचा अंत मात्र सुखांत आहे. परंतु, आज इतर प्राणिमात्रांनी माणसाचा शत्रू होण्यापेक्षा माणूसच झालाय माणसाचा वैरी. दुसºयाला नष्ट करण्याच्या कुविचारांचे गिधाडे आणि घारी आकाशात नव्हे, तर माणसाच्या डोक्यात घिरट्या घालत आहेत. जिकडे-तिकडे हिंंसेच्या ज्वाला उफाळत आहेत. मानवतेची राख-रांगोळी होत आहे. अशा वेळी शांतीला परब्रह्म मानणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -शांती तोचि समाधान। शांती तोचि ब्रह्मज्ञान ।शांती तोचि ब्रह्म पूर्ण। सत्य जाण उद्धवा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक