शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

आनंद तरंग: शांती परते नाही सुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 02:08 IST

दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत.

प्रा. शिवाजीराव भुकेले

शांती नावाच्या स्फटिकगृहातील डोलणारे अजातशत्रू दीपक म्हणजे संत होत. समता, ममता आणि शांती ही संताच्या जीवनातील त्रिवेणी होती. संसारात घडणाऱ्या नाना घटनांनी संताच्या मनाची शांती कधी विचलित झाली नाही. भ्रांतक्रांत व गलितगात्र झालेल्या समाजाला सन्मार्गाचा व सुसंस्काराचा उजेड दाखविण्याचे काम शांती नावाचा सद्गुण करतो. नदीचा प्रवाह हा जसा स्वाभाविकपणे सागराकडे जाण्यासाठी प्रवाहित होतो, सूर्यफूल जसे सूर्याच्या तेजाकडे तोंड करून बसते अन् आपल्या पिवळ्या धम्मक सगुण रूपाचा साक्षात्कार देते, चकोर जसे चंद्राकडे अमृतकणाची आस करण्यासाठी आपली चोच उघडून बसतात तसे संत भगवंताकडे शांत व संयमी जीवनाचे दानङ्कमागतात. कारण शांती हेच जगातील सर्वोत्तम सुख आहे. शांत-शांत जलाशयात जसे चंद्रासहीत स्वत:चे प्रतिबिंंब न्याहाळता येते अगदी तसेच शांत-शांत मनरूपी सरोवरात जीवत्वाचे भाव गळून जातात आणि शिवत्वाकडे वाटचाल सुरूहोते. निंदा-अवज्ञा-उद्धटपणा यांचे अडथळे जीवनरूपी रस्त्यावर वारंवार येणारच; पण या अडथळ्यांना पार करून जो अडथळा आणणाऱ्यांचे अहित चिंतित नाही तो शांतीचा प्रत्यक्ष पुतळा असतो. दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत. कारण मानसिक शांती हाच तर संताचा स्थायीभाव होता. शरीराच्या पसाºयातील आपलाच हात अन् पाय आपल्याच अंगावर आदळला म्हणून आपण त्याला कधी कापून टाकत नाही. समाजात अगदी तसेच आहे म्हणून संत जगाचे आघात अगदी शांतपणे सहन करतात. शांती हेच परमसुख आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात -

शांती परते नाही सुख। येर आवघेचि दु:ख।म्हनवूनि शांती घरा। उतराल पैलतीरा।खवळलीया कामक्रोधी। अंगी भरती आधीव्याधी।तुका म्हणे विविध ताप। जाती मग आपोआप॥वैषयिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या आजच्या भयग्रस्त जीवनात शांती परते सुख नाही. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता धोक्यात येत आहे. आंचन, कांचन, करवंदीने भरलेला, ऋषीमुनींच्या शांतीघोषाने दुमदुमणारा आपला भारत देश चहूबाजूने अशांत होत आहे. अशा वेळी धीर धरा रे, धीरापोटी शांती उपजेल गोमटी असा संदेश देणाºया संत विचारांची आज खरी गरज आहे. जेथे शांती नसते तेथे संसारिक असो वा पारमार्थिक असो अशा शांत-सुखाला कधी थाराच मिळू शकत नाही. शांततेच्या अभावाने आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळलेल्या जगात हिंसेच्या आणि भयाच्या नरसंहारक लाटा उसळत असतात. म्हणूनच विचारवंत आजही संदेश देत आहेत की, आता युद्ध नको बुद्ध हवा. समाज जीवनाला अधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक तापांनी तप्त केले आहे त्यावर आपल्या हृदयस्थ शांतीचेच शिंंपण करायला हवे. जगात इतर प्रत्येक विषयांचा अंत दु:खांत आहे; पण शांतीचा अंत मात्र सुखांत आहे. परंतु, आज इतर प्राणिमात्रांनी माणसाचा शत्रू होण्यापेक्षा माणूसच झालाय माणसाचा वैरी. दुसºयाला नष्ट करण्याच्या कुविचारांचे गिधाडे आणि घारी आकाशात नव्हे, तर माणसाच्या डोक्यात घिरट्या घालत आहेत. जिकडे-तिकडे हिंंसेच्या ज्वाला उफाळत आहेत. मानवतेची राख-रांगोळी होत आहे. अशा वेळी शांतीला परब्रह्म मानणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -शांती तोचि समाधान। शांती तोचि ब्रह्मज्ञान ।शांती तोचि ब्रह्म पूर्ण। सत्य जाण उद्धवा ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक