शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 08:43 IST

कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते.

कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते. समाजरचनेत सामाजिक सामंजस्याचे विचार रुजवायचे असतील तर भक्ती, वाङ्मयीन, शैक्षणिक चळवळीतही त्या व्यक्तीचे ‘मन’ समजून घेणे गरजेचे असते. समाजात असे कितीतरी लोक आहेत की कुणाच्याही मनाचा विचार न करता काही गोष्टी घडवतात. समाजातील तर्क-वितर्क मनावरच अवलंबून असतात. अज्ञानाने निर्माण झालेल्या घटनांचा मनावर आघात होतो. त्या मनावर घडलेल्या संस्काराचा परिणाम समाजात जाणवतो. व्यक्ती -व्यक्ती मिळून समाज होतो. त्या समाजाचे ‘मन’ ओळखून समाजात काही लोक वागतात. त्याचे कारण त्या-त्या समाजाची जडणघडण समजावून घेणे, त्या प्रक्रियेत कार्यरत होणे ही प्रत्येक माणसाची व समाजाची धडपड असते. कारण समाजात चांगल्या मनाचा उपयोग होऊ शकतो.

माणसाच्या माणूसपणाची ओळख मनावरूनच होते. मनाच्या कप्प्यात प्रथम एखादी कृती तयार होते, मग त्यावरून त्या व्यक्तीचे मूर्तरूप लक्षात येते. माणसाचे व्यक्तिगत अथवा सार्वजनिक अनुभव व्यक्त करण्याचे साधनही मनच आहे. मनामुळेच मनुष्याच्या स्वभावात बदल घडतो. अस्तित्वाच्या लढाईत मन कधी सबळ अथवा दुर्बल बनते. कोणतीही क्रांती त्या व्यक्तीच्या वैचारिकतेवर घडत असते. त्याच्यातील आमूलाग्र बदल मन:स्थितीवर अवलंबून असतात. मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया आहे. वर्तनानुसार त्याच्या मनाची ओळख होते. मनाचे अध्ययन मानसशास्त्रात केले आहे. एकाच व्यक्तीच्या मनात वारंवार विकल्प येतात तेव्हा त्याकाळात मनाची एकच एक स्थिर अवस्था अस्तित्वात नसते. गतिशील मनाचे परिवर्तन होत असते. एक मन परिवर्तनशील असते, तर दुसरे मन अस्तित्वाचा विचार करते. ह्या दोन्ही मनाचा अभ्यास अनुभवविश्वावर चालत असतो. मनामुळेच व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मनाची एकात्मता आणि समाजाची अस्मिता महत्त्वपूर्ण असते. मनाच्या अवस्थेचा समाजाच्या जीवनसरणीवर परिणाम होतो. मनाच्या साह्याने सर्व गोष्टी नियंत्रित केल्या जातात. माणसाच्या वर्तनाची अंगभूत बाजू मनावर परिणाम करते. विचार करण्याची प्रक्रिया मनाची आहे. मनाच्या अनुभवविश्वाशी आपली गाठ बांधली पाहिजे. न कळत मनातील इच्छा, आकांक्षा, भव-भावना प्रसंगानुरूप प्रकट होतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक