शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 08:43 IST

कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते.

कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तीची मन:स्थिती महत्त्वाची असते. समाजरचनेत सामाजिक सामंजस्याचे विचार रुजवायचे असतील तर भक्ती, वाङ्मयीन, शैक्षणिक चळवळीतही त्या व्यक्तीचे ‘मन’ समजून घेणे गरजेचे असते. समाजात असे कितीतरी लोक आहेत की कुणाच्याही मनाचा विचार न करता काही गोष्टी घडवतात. समाजातील तर्क-वितर्क मनावरच अवलंबून असतात. अज्ञानाने निर्माण झालेल्या घटनांचा मनावर आघात होतो. त्या मनावर घडलेल्या संस्काराचा परिणाम समाजात जाणवतो. व्यक्ती -व्यक्ती मिळून समाज होतो. त्या समाजाचे ‘मन’ ओळखून समाजात काही लोक वागतात. त्याचे कारण त्या-त्या समाजाची जडणघडण समजावून घेणे, त्या प्रक्रियेत कार्यरत होणे ही प्रत्येक माणसाची व समाजाची धडपड असते. कारण समाजात चांगल्या मनाचा उपयोग होऊ शकतो.

माणसाच्या माणूसपणाची ओळख मनावरूनच होते. मनाच्या कप्प्यात प्रथम एखादी कृती तयार होते, मग त्यावरून त्या व्यक्तीचे मूर्तरूप लक्षात येते. माणसाचे व्यक्तिगत अथवा सार्वजनिक अनुभव व्यक्त करण्याचे साधनही मनच आहे. मनामुळेच मनुष्याच्या स्वभावात बदल घडतो. अस्तित्वाच्या लढाईत मन कधी सबळ अथवा दुर्बल बनते. कोणतीही क्रांती त्या व्यक्तीच्या वैचारिकतेवर घडत असते. त्याच्यातील आमूलाग्र बदल मन:स्थितीवर अवलंबून असतात. मानवी मन ही एक वर्तनप्रक्रिया आहे. वर्तनानुसार त्याच्या मनाची ओळख होते. मनाचे अध्ययन मानसशास्त्रात केले आहे. एकाच व्यक्तीच्या मनात वारंवार विकल्प येतात तेव्हा त्याकाळात मनाची एकच एक स्थिर अवस्था अस्तित्वात नसते. गतिशील मनाचे परिवर्तन होत असते. एक मन परिवर्तनशील असते, तर दुसरे मन अस्तित्वाचा विचार करते. ह्या दोन्ही मनाचा अभ्यास अनुभवविश्वावर चालत असतो. मनामुळेच व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मनाची एकात्मता आणि समाजाची अस्मिता महत्त्वपूर्ण असते. मनाच्या अवस्थेचा समाजाच्या जीवनसरणीवर परिणाम होतो. मनाच्या साह्याने सर्व गोष्टी नियंत्रित केल्या जातात. माणसाच्या वर्तनाची अंगभूत बाजू मनावर परिणाम करते. विचार करण्याची प्रक्रिया मनाची आहे. मनाच्या अनुभवविश्वाशी आपली गाठ बांधली पाहिजे. न कळत मनातील इच्छा, आकांक्षा, भव-भावना प्रसंगानुरूप प्रकट होतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक