विदर्भात आणखी तीन दिवस सूर्य आग ओकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:58 PM2018-05-08T12:58:08+5:302018-05-08T12:58:17+5:30

Three more hot days in Vidarbha | विदर्भात आणखी तीन दिवस सूर्य आग ओकणार

विदर्भात आणखी तीन दिवस सूर्य आग ओकणार

Next
ठळक मुद्देउष्णतेची तीव्रता वाढणार ‘गरज असेल तरच बाहेर पडा’ चा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भातील बहुतांश भागात १० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार वर्तविली आहे. या काळात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याकरीता जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे.
तीव्र उन्हात मुख्यत: दुपारी १२ ते ३ या वेळात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पीत राहावे, फक्त हलक्या रंगाचे सुती कापडाचा वापर करावा, घराबाहेर पडताना छत्री, टोपी, गॉगलचा वापर करावा, मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेय पिण्याचे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, उन्हात काम करताना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावा, चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे. ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शीतपेयांचे भरपूर सेवन करावे, प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करा. ओल्या कपड्याने त्यांना पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका. ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शीतपेय द्यावे. ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. व्यक्तीला त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरू शकते, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Three more hot days in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.