ग्रामीण भागातूनही रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:15 AM2018-06-28T00:15:11+5:302018-06-28T00:15:15+5:30

ग्रामीण भागात पावसाळा आला की पूर्वी सर्रास रानभाज्याचा वापर होत असे मात्र आता रानभाज्या दुर्मिळ झाल्याने त्याचा वापरही कमी होऊ लागला आहे.

On the way to extinction of wildlife from rural areas | ग्रामीण भागातूनही रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

ग्रामीण भागातूनही रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

Next

शशिकांत ठाकूर
कासा : ग्रामीण भागात पावसाळा आला की पूर्वी सर्रास रानभाज्याचा वापर होत असे मात्र आता रानभाज्या दुर्मिळ झाल्याने त्याचा वापरही कमी होऊ लागला आहे.
पावसाळ्यात पूर्वी खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबे तर पूर्वी पावसाळाभर आहारात रानभाज्याचाच वापर करीत असत. तर जगलात जाऊन रानभाज्या शोधून त्या शहरीभागात विकून काही लोकांना रोजगार ही मिळत असे. रानभाज्या मध्ये शेवली, कोळीभाजी, लोत, माटभाजी, टाकले, तेर, चाईचे देठ, बाफली, कोहरेल, धोधडी, अळू या पालेभाज्या तर बांबूचे देठ, कंद, कडूकंद या कंदभाज्या पेंढर, अळू, काकड, भोकर, कर्टुले, करडु, टेटवी, आळीम या फळभाज्यांचा आहारात वापर केला जात असे. शेवली या भाजीला विशेष मागणी असून त्यांच्यातील खाजरटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये काकड टाकली जातात. तर उंच डोंगर उतारावर आढळणाऱ्या बाफली रानभाजीमध्ये औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे त्याची फळही साठवून ठेवली जातात. कोवळ्या बांबूचा देठ त्यास ग्रामीण भाषेत वास्ता असे संबोधले जाते असून त्यापासून शिंद ही भाजी मिळवली जाते. त्याचा ग्रामीण भागात पावसाळ्यात आजही वापर बर्याच ठिकाणी केला जातो. परंतु आता बांबूची झाडे कमी झाल्याने शिंद बनविण्यासाठी जंगलातुन लोक आता कोवळे बांबूचे देठ शोधून आणतात. कार्टुले ह्या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरिभागातही मोठी मागणी असते. तर कडूकंद पासून वली बनवतात त्या कडू असल्याने त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी टाकून शिजवल्या जातात.

Web Title: On the way to extinction of wildlife from rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.