गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 01:37 AM2019-05-05T01:37:50+5:302019-05-05T01:38:48+5:30

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Near the Ganeshpuri Gram Panchayat, there is severe water scarcity in the Katkari pada | गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

Next

अनगाव - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उसगाव येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी नालासोपारा, विरार तसेच उसगावला दिले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरीवाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नाही.

गणेशपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील कवाडपाडा येथे बोअरवेल आहे. पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. अशा नित्यानंद महाराज यांच्या पावनभूमीत आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही धक्कादायक बाब आहे.

गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांना सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र, येथील नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनक्षेत्र हे कागदोपत्री आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते. पाणीटंचाईसंबंधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणीपुरवठा विभागाने का उपाययोजना केल्या नाहीत, असा प्रश्न संघटनेचे कार्यकर्ते जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

गणेशपुरी गावाजवळ असणाºया पाड्यांत टंचाई जाणवत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन काय करते आहे, की पाण्यासाठी एखादा जीव गमावल्यावर ते येथील टंचाई दूर करणार, असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.

या पाड्यांवर बोअरवेल आहेत. त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. येथील पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कवाडपाडा येथे बोअरवेल आहे, मात्र पाणी नाही. पाण्याची टाकी आहे, ती कोरडी आहे. उसगाव येथील कातकरीवाडीत बोअरवेलला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.

पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकाकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षीही भिवंडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र अधिकारी ते मान्य करत नव्हते. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रकार उघड केला तेव्हा अधिकाºयांची धावपळ झाली. लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत अधिकाºयांना धारेवर धरले. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.

समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू

या पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिलेली आहे. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- विनोद पाटील, उपसरपंच, गणेशपुरी
 

Web Title: Near the Ganeshpuri Gram Panchayat, there is severe water scarcity in the Katkari pada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.