जागेच्या वादावरून भिवंडीत हत्या, पत्नीसमोर पतीवर केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:02 PM2018-11-12T15:02:35+5:302018-11-12T15:04:27+5:30

भिवंडी :शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून काल सायंकाळी सव्वासहा वाजता अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची ...

He has been killed by the land dispute and his wife has been killed | जागेच्या वादावरून भिवंडीत हत्या, पत्नीसमोर पतीवर केले वार

जागेच्या वादावरून भिवंडीत हत्या, पत्नीसमोर पतीवर केले वार

Next
ठळक मुद्देमृत आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज व अफरोजचे बांधकामभरदिवसा शांतीनगर भागातील रस्त्यावर चाकून केली हत्याआरोपी फिरोजला लोकांनी पकडून दिले पोलीसांच्या ताब्यात

भिवंडी:शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून काल सायंकाळी सव्वासहा वाजता अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची हत्या करण्यात आली.ही हत्या त्याच्या पत्नीसमोर केल्याने परिसरांत दहशत निर्माण झाली असून या घटनेच्या वेळी परिसरांतील लोकांनी हल्लेखोरांतील एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
मोहम्मद आवेश उर्फ राजू अन्सारी (२५)असे मयत युवकाचे नांव असून तो पिराणीपाडा रहेमते मदिना मशीदजवळ आपल्या कुटूंबासह रहात होता. तो काल रविवार रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता दुचाकीवरून पत्नी कुलसुम व मुलासह भाजी आणण्याकरीता मार्केटकडे जात होता. तेंव्हा त्यांच्या मागून अफरोज बिलाल अन्सारी हा रिक्षातून त्यांचा पाठलाग करीत आला.मोहम्मद आवेशची दुचाकी अमजदीया हायस्कुलच्या बाजूला आली असता त्याने रिक्षाने मागून धक्का मारून दुचाकीवर बसलेल्या तिघांना खाली पाडले. त्याच वेळी रिक्षातून बाहेर येऊन अफरोज याने शिवीगाळी करीत हातातील चाकूने धमकावीत आवेश उर्फ राजू अन्सारी याच्या छातीवर,पोटावर,हातावर व पायावर वार केले.त्याचवेळी तेथे अफरोजचा भाऊ फिरोज बिलाल अन्सारी याने तेथे मदतीकरीता जमलेल्या लोकांना ‘कोई बिचमें नही आना’अशी धमकी देत मदतीपासून परावृत्त केले. या घटनेनंतर जखमी आवेश यांस इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत उपचारास आणले असता तेथील डॉक्टरांनी आवेश मृत झाल्याचे घोषित केले. तर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी फिरोज यांस पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.मृत मोहम्मद आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज व अफरोज हे दोघे भाऊ अतिक्रमण करून बांधकाम करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होते. त्यावादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अफरोज व फिरोज बिलाल अन्सारी या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन फिरोज यांस अटक केली आहे.या घटनेने परिसरांतील लोकांमध्ये घबराट पसरली असुन हत्या करणाऱ्या दोघा भावांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: He has been killed by the land dispute and his wife has been killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.