भिडेंची शेतीच नाही, तर आंबा कोठून देणार? नितीन चौगुले; माध्यमांकडून विपर्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:12 AM2018-06-15T00:12:06+5:302018-06-15T00:12:06+5:30

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे,

There is no farming of Bhaden, but where will mango be? Nitin Chougule; Distinction from the media | भिडेंची शेतीच नाही, तर आंबा कोठून देणार? नितीन चौगुले; माध्यमांकडून विपर्यास

भिडेंची शेतीच नाही, तर आंबा कोठून देणार? नितीन चौगुले; माध्यमांकडून विपर्यास

Next

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

भिंडेंची शेतीच नाही, तर ते औषधी आंबा कोठून देणार? त्यांच्या मित्राने शेतात लावलेल्या आंब्यामुळे अनेक महिलांना पुत्रप्राप्ती झाल्याचा किस्सा बोलून दाखविला होता, तोच भिडेंनी सांगितला; पण प्रसारमाध्यमांनी भिडेच असे बोलल्याचे दाखवून त्यांची बदनामी केली आहे, असेही चौगुले यांनी सांगितले.

भिडे यांनी नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी ‘माझ्या शेतातीत आंबा खाल्ल्याने महिलांना पुत्रप्राप्ती होते. आतापर्यंत १८० दाम्पत्यांना या आंब्याचा गुण आला आहे’, असा दावा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. भिडेंच्या या विधानाचा अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे चौगुले यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषद घेतली.

चौगुले म्हणाले की, भिडे यांंना मांजर्डे येथील त्यांचे परिचित मोहनराव शिवाजीराव मोहिते ३५ वर्षांनी भेटले. त्यावेळी मोहिते यांनी भिडेंना सांगितले की, धाराशीव येथे मला आंब्याच्या ११० प्रकारच्या जाती आढळल्या. भगवंताच्या कृपेने मला एक कोय मिळाली. तिचे झाड वाढवले. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे, ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन दहा-बारा वर्षे होऊनसुद्धा ज्यांना पोरं होत नाहीत, अशा पती-पत्नींनी या झाडाचा आंबा खाल्ला, तर त्यांना निश्चित पोरं होतात. मी आतापर्यंत १८० दाम्पत्यांना हे आंबे खायला दिलेत. यातील दीडशेपेक्षा जास्तजणांना मुलं झाली आहेत. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असा हा वंध्यत्वावरचा गुणकारी आंबा आहे.

हा बदनामीचा डाव
दोन वर्षांपासून समाजविघातक शक्ती संभाजी भिडे यांच्या बदनामीचा डाव आखत असल्याचा आरोप चौगले यांनी केला.

Web Title: There is no farming of Bhaden, but where will mango be? Nitin Chougule; Distinction from the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.