पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:46 AM2018-07-09T03:46:40+5:302018-07-09T03:46:55+5:30

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain hits the district, four hours traffic jam due to collapsing in Matheran Ghat | पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

googlenewsNext

अलिबाग - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे माथेरान घाटामध्ये दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीच हानी झाली नाही. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबतची माहिती मिळताच तेथे तातडीने संबंधित यंत्रणांच्या मदतीने रस्त्यात पडलेली दरड हटवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती विभागाचे सागर पाठक यांनी सांगितले.
पेण तालुक्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३३८ मि.मी. पावसाची नोंद झाली, तसेच रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पेण तालुक्यातील तळवली येथील गंगाराम वाघमारे आणि रामा पवार यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे निगडेवाडी येथील श्रावण पवार यांच्याही घराचे नुकसान झाले. आंबेघर येथील समाजमंदिरालाही पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी शनिवारी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, रविवारी त्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले. ही आकडेवारी दुपारी १ वाजेपर्यंतची आहे.

किनारी गावांना सतर्कतेचा इशारा
सोमवार ९ जुलैपर्यंत धुवाधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सुमारे ७ ते २४ से.मी. पावसाची शक्यता असल्याने नदी, किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.२४ तासांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील पर्जन्यमान
अलिबाग ३७ मि.मी., पेण-८० मि.मी.,
मुरु ड-९८ मि.मी., पनवेल-१३५.२० मि.मी., उरण-२२ मि.मी., कर्जत-२३१.४० मि.मी., खालापूर-२२१ मि.मी., माणगाव-२५० मि.मी., रोहा-८१ मि.मी., सुधागड-११५ मि.मी., तळा-१७१ मि.मी., महाड-२४४ मि.मी., पोलादपूर-१४० मि.मी., म्हसळा-१४२.८० मि.मी., श्रीवर्धन-५० मि.मी., माथेरान-११० मि.मी.

माणगाव येथे सर्वाधिक २५० मि.मी.
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३३.०९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तसेच १ जूनपासून रविवारपर्यंत सरासरी १३८६.२९ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

कालवा फुटल्याने माणगाव शहरात शिरले पुराचे पाणी

र्
माणगाव : माणगावच्या काळनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील काही भागांत नदीचे पाणी शिरले असून, माणगावचा उतेखोल येथील कालवा फुटल्याने परिसरातील घरात पाणी शिरले.
नदीपासून काही अंतरावर असलेल्या निकम स्कूल, माणगाव कोर्ट व विश्रामगृह तसेच अनेक इमारतींच्या परिसरात पाणी साचले आहे. तसेच कचेरी रोडवरील रेल्वे ब्रिज खाली पाणी शिरले.
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कालवा फुटून माणगावमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कामी आली व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते, त्या वेळीही घरात पाणी शिरले होते. आज नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. कालवा काळप्रकल्प संबंधित पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी असलेली गळती बंद केली असती तर कालवा फुटला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उतेखोल कालवा पूल (सायपन) अत्यंत धोकादायक झाला आहे.

जनजीवन विस्कळीत


मुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहर, तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रायगड जिल्ह्यात शनिवार सर्वच धुवाधार पाऊस पडला; परंतु याला मुरुड तालुका मात्र अपवाद राहिला. येथे ९८ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला. रविवारी मात्र पावसाचा जोर वाढल्याने भाजी मार्केट व मासळी मार्केटमधील गर्दी ओसरून येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.
शहरातील गोलबंगला, मारु ती नाका, बाजारपेठ आदी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत एका घराचे पावसामुळे किरकोळ नुकसान असून, याबाबत पंचनामा करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी आहे.
मुरुड तालुक्यात आतापर्यंत १३६४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाºया पावसामुळे पर्यटकांची संख्या येथे रोडावली आहे.
समुद्रकिनारे सामसूम होते. हॉटेल व लॉजिंगचा व्यवसायसुद्धा मंदावला आहे. ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. संततधार पावसामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गाड्या खूप उशिराने मुरु ड आगारात परतत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासात दीड तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे होड्या समुद्रात न गेल्याने सध्या मासळी बाजारात मासळीचा तुटवडा जाणवला.

Web Title: Rain hits the district, four hours traffic jam due to collapsing in Matheran Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.