सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:40 AM2017-09-29T03:40:41+5:302017-09-29T03:45:29+5:30

सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता स्पर्धेचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वधर्म, जातपात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे. असा विचार प्रत्येकाच्या अंतकरणातून आला पाहिजे.

Humanity must be born of public celebrations - Dr. Appasaheb Dharmadhikari | सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

googlenewsNext

- आविष्कार देसाई ।

अलिबाग : सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता स्पर्धेचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वधर्म, जातपात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे. असा विचार प्रत्येकाच्या अंतकरणातून आला पाहिजे. चांगल्या विचारांची भूमिका ही नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. ‘लोकमत’ आणि रायगड पोलीस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसविण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले आहेत.
‘लोकमत’ आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने जिल्ह्यात आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ््याचे शानदार आयोजन पीएनपी नाट्यगृहात गुरुवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेतील विजयी गणेश मंडळांना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मानवाच्या अंतकरणामध्ये अवगुण आणि सद्गुण असे दोन भाग असतात. अवगुणांमुळे मानव समाजाला त्रास होतो. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, द्वेष, संशय असे वाईट विचार अंतकरणातूनच येतात. त्याची शिक्षा मात्र शरीराला भोगावी लागते. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. कायद्याच्या राज्यात चुकीला शिक्षा झालीच पाहिजे, असे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले. सद्विचार चांगल्या कामात वापरण्यासाठी मनाचा अभ्यास चांगला असला पाहिजे आणि हेच विचार बैठकीच्या माध्यमातून रुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या विचारांनी आयुष्य सुखी होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
बुवाबाजी, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवू नका. चांगले विचारच आयुष्याला संरक्षण देतील. बालवयात चांगले संस्कार झाल्यास चांगली सुसंस्कृत मने निर्माण होऊन देश समृद्धीला येईल, असे परखड मतही डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. देशभर बैठकीच्या माध्यमातून बाल संस्कार केंद्रे चालवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक मंडळांकडे मोठ्या संख्येने मानव शक्ती आहे. राष्ट्रहितासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मंडळांनी समाज प्रबोधनासाठी असेच पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सणासुदीच्या काळात दिवसरात्र रस्त्यावर राहून समाजाला आनंद देण्याचे पोलिसांचे कार्य महान आहे. रस्तावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी समाजानेही स्वत:ला शिस्त लावून घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रकाश भाऊ धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर विमल राजपूत, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक विजय सिंग, वृत्तपत्र वितरक संजय कर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे २७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. तालुका स्तरावर तीन मंडळांची निवड परीक्षक मंडळाने केल्यावर त्यांतून ११ गणेशोत्सव मंडळांची निवड जिल्हास्तरीय समितीने जिल्हास्तरीय पारितोषिकांकरिता केली होती. पूर्वआवाहनानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेकरिता ठेवलेल्या विषयांना अनुसरून देखावे व आरास केली होती.
मेक इन इंडियास पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामस्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर अत्यंत कल्पकतेने कार्यकर्त्यांनी देखावे साकारून लोकप्रबोधन केले. डीजे वा अन्य मोठ्या आवाजांच्या स्पीकर्सचा वापर करणार नाही, असा निर्णय अनेक गणेशोत्सव मंडळांनी स्वेच्छेने घेतला होता. यामुळे ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

१गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रहिताच्या कामात हातभार लावण्यासाठी शाळा, गरीब खेळाडू, समुद्रकिनारे दत्तक घ्यावेत. स्पर्धा परीक्षांसाठी गरजूंना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वाेतोपरी मदत करेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या कमानी लागल्या आहेत. यातून जनसामान्यांमध्ये असलेला त्यांच्या कार्याचा प्रभाव दिसून येतो. अशा महानविभूतींच्या सानिध्यात काम करायला मिळणे हे भाग्य समजतो, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
२रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्याच जिल्ह्यामध्ये डॉ. धर्माधिकारी परिवार समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. त्याच जिल्ह्यात काम करायला मिळण्यासाठी भाग्य लागते, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. ‘लोकमत’ने समाजिक कार्यात रायगड पोलिसांना सामावून घेतले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करून, असे उपक्रम घेण्याचे आवाहन केले.
३नुपूर नृत्य संस्थेच्या ऐश्वर्या आणि श्राव्या यांनी गणेशस्तवन नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवयित्री सुजाता पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील पारितोषिक विजेती गणेशोत्सव मंडळे
प्रथम पारितोषिक
रु.१०,००० आणि स्मृतिचिन्ह
आदर्श मित्रमंडळ, अलिबाग.
द्वितीय पारितोषिक
रु.७००० आणि स्मृतिचिन्ह
संत रोहिदासनगर सार्व. गणपती मंडळ, महाड.
तृतीय पारितोषिक
रु.५००० आणि स्मृतिचिन्ह
बालमित्र मंडळ, वरची खोपोली, खोपोली.

विशेष उल्लेखनीय पारितोषिक १००० रु पये आणि स्मृतिचिन्ह
१नवतरुण मित्रमंडळ,
खानाव, ता. अलिबाग.
२सार्वजनिक गणेश मंडळ,
कर्जत बाजारपेठ, कर्जत.
३न्यूस्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तरेआळी, पेण.
४काळकाई माता क्रीडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोलादपूर.
५श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय,
श्रीवर्धन.
६आदर्श समता नगर रहिवासी मंडळ, माणगाव.
७श्री भैरवनाथ मित्रमंडळ,
परळी-पाली.
८सार्वजनिक गणेशोत्सव,
भाटे वाचनालय, रोहा.

गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावर विनाकोंडी वाहतूक सुरळीत ठेवणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा गौरव

जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख
पोलीस निरीक्षक
मनोज म्हात्रे
नियंत्रण कक्ष
पोलीस निरीक्षक
दादासाहेब सिदा घुटुकडे
वडखळ पोलीस ठाणे
पोलीस नाईक
महेश काशिनाथ रुईकर
महाड शहर पोलीस ठाणे
पोलीस नाईक
भानुदास अनंत म्हात्रे.
वाहतूक शाखा
पोलीस हवालदार
दिनेश पांडुरंग थळे
वाहतूक शाखा
पोलीस हवालदार
प्रवीण सुदाम पिंपरकर
वाहतूक शाखा
पोलीस हवालदार
सुनील नामदेव गायकवाड
वाहतूक शाखा
पोलीस हवालदार
विशाल विजय येलवे
वाहतूक शाखा
पोलीस नाईक
अक्षय एकनाथ जाधव
वाहतूक शाखा
पोलीस नाईक
नीतेश पांडुरंग कोंडाळकर
वाहतूक शाखा
महिला पोलीस शिपाई
संजीवनी गावडू पाटील
वाहतूक शाखा
पोलीस शिपाई
सुहास प्रल्हाद काबुगडे

Web Title: Humanity must be born of public celebrations - Dr. Appasaheb Dharmadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.