शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:25 AM2017-10-23T01:25:01+5:302017-10-23T01:25:04+5:30

शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे.

Four mothers die in four years, 50 mothers die every year | शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

शहरात चार वर्षांत चारशे मातामृत्यू, सरासरी वर्षाला ५० मातांचा मृत्यू

Next

विशाल शिर्के ।
पुणे : शहरात गेल्या सात वर्षांत ३८८ मातांना आपले प्राण गमवावा लागला आहे. राज्यात एक लाखामागे तब्बल ५० वर मातांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात होणा-या मातामृत्यूपेक्षा अत्याधुनिक आरोग्यसेवा असलेल्या शहरातील मातामृत्यूचे प्रमाण चौपट आहे.
गर्भारपणातील मृत्यू, प्रसूतीदरम्यान झालेला आणि प्रसूतीनंतर ३२ आठवड्यांच्या आत संबंधित मातेचा मृत्यू झाल्यास त्याला मातामृत्यू मानण्यात येतो. राज्यात २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत १ हजार ९८६ मातांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्र वगळून राज्यात यवतमाळ जिल्ह्यात २०१३ ते २०१६-१७ या चार वर्षांमध्ये तब्बल १४७ मातांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २०१६-१७ मध्ये ६० हजार १०५ प्रसूती झाल्या होत्या, त्यापैकी १ हजार ९२७ सरकारी आणि खासगी रुग्णालयात ३ हजार ८९५ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. याच वर्षात येथे २७ मातांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.
शहरातील गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास प्रत्येक वर्षी सरासरी पन्नासहून अधिक मातांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात वर्षांत २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ५३ मातामृत्यूंची नोंद शहरात झाली आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास २०१३-१४ मध्ये ६६,४१७, तर १४-१५ मध्ये ६५,९९१ आणि १५-१६ मध्ये ६५,०३२ प्रसूती झाल्या. तसेच १६-१७ यावर्षी ७४,१४२ प्रसूतीची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ११, १४, १० आणि ९ इतके आहे. शहरातील अत्याधुनिक सुविधा असूनदेखील पन्नास हजार प्रसूतीमागील मातामृत्यूचा आकडा चक्रावून टाकणारा आहे.
रक्तस्राव, बाळंतपणात आलेले झटके, घरातील अस्वच्छतेमुळे अथवा संबंधित रुग्णालयातील चुकीच्या हाताळणीमुळे झालेला जंतूसंसर्ग, बाळाचे डोके मोठे असणे,
रक्तक्षय, उच्च रक्तदाब अशा
विविध कारणांमुळे मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बाळंतपणात मातेची वारंवार तपासणी केली पाहिजे. हिमोग्लोबिन, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ््या अथवा लस घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
> महाराष्ट्रात लाखामागे ६८ बालमृत्यू
देशात सर्वांत कमी मातामृत्यू असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. लाखामागे राज्यात ६८ बालमृत्यू होतात. केरळ असून, त्यांचे प्रमाण लाखामागे ६१ ते ६२ इतके आहे.
यापूर्वी २००९ ते २०११ या काळात राज्यातील मातामृत्यूचे प्रमाण ८७ इतके होते. रक्तक्षय, जंतूसंसर्ग ही एक महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विभागाच्या १०८ या क्रमांकावर महिलांना याबाबत संपूर्ण मदत मिळते.
>साल एकूण प्रसूती मातामृत्यू
२०१०-११ ४८,३६८ ३७
२०११-१२ ५३,०२४ ४३
२०१२-१३ ५०,२९० ६४
२०१३-१४ ५३,६९६ ५३
२०१४-१५ ५१,४४३ ६६
२०१५-१६ ४६,४५२ ५३
२०१६-१७ ५०,७०० ४९
आॅगस्ट २०१७ २१,७५१ २३
>ग्रामीण भागातील रुग्णालयात एखाद्या महिलेला काही वैद्यकीय अडचण उद्भवल्यास तिला शहरातील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे येथील मातामृत्यूचा आकडा अधिक दिसत आहे. पूर्वी वाहतुकीच्या तितक्याशा सोयी नसल्याने शहरातील रुग्णालयात आणताना वाटेतच मातेचा मृत्यू झाल्याच्या घटना व्हायच्या. त्यात घट झाली आहे.
- डॉ. मीनाक्षी देशपांडे, सहसचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे

Web Title: Four mothers die in four years, 50 mothers die every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू