Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:18 PM2019-04-29T12:18:49+5:302019-04-29T12:42:24+5:30

शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.

Lok Sabha Election 2019 auto rickshaw for handicapped voters in shirur | Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

Next
ठळक मुद्देशिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे.रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.शिरूर मतदार संघातील दिघी येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी 7 रिक्षांची सोय करण्यात आली आहे.

पिंपरी - राज्यातल्या चौथ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे. अनेक दिग्गज उमेदवारांच भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होतं आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या मतदार संघात मतदान पार पडत आहे. शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या दोन मतदार संघामध्ये मतदान पार पडतं आहे. 23 एप्रिलला पुण्यात मतदान पार पडले होते. पुणेकरांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे अवघे 49 टक्के मतदान पुण्यात झाले. मतदान केंद्रावर जाण्यासाठी अनेकदा सुविधा नसल्यामुळे दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास कोणी नसल्यास असे मतदार मातदानापासून मुकतात. त्यामुळे या वेळेस प्रशासनाने खबरदारी घेतली असून, दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी ऑटो रिक्षाची सोय करण्यात आली आहे. शिरूर मतदार संघातील दिघी येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी 7 रिक्षांची सोय करण्यात आली आहे. आज दिवसभर ही सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात येणार आहे.


लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 12 वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्याईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.



 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 auto rickshaw for handicapped voters in shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.