साताऱ्यात धुक्याची दुलई, नागरिकांना आल्हाददायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:57 AM2019-09-29T11:57:16+5:302019-09-29T12:00:20+5:30

सात डोंगरांनी वेढलेल्या साताऱ्यात आजची सकाळ स्वर्ग सुख देणारी ठरली.

यवतेश्वर, अजिंक्यतारा या दोन डोंगराच्या मधोमध असलेल्या शहराचे अस्तित्वच धुक्यात हरवून गेले होते.

या धुक्यामुळे रस्त्यावरून गाडी चालवणंही अवघड झालं होतं.

साक्षात पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्याचा भास होत होता. महाबळेश्वरला असे दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळते,

पण आता साताऱ्यातही हे दृश्य पहायला मिळाल्याने सातारकर आणि पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे.