Health Tips : भात आणि चपाती एकत्र खाणं आरोग्यास हानिकारक ठरतं का? जाणून घ्या सत्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 12:29 PM2022-09-19T12:29:13+5:302022-09-19T12:40:38+5:30

डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. चला जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी...

भात आणि चपाती एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात. पण ज्यावेळी पचन तंत्र कमजोर होऊ लागतं किंवा वजन कमी करण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांना या प्रश्नाबाबत जाणून घ्यायचं असतं. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. चला जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी...

भात-चपाती एकत्र का खाऊ नये? - द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये? असा प्रश्न विचारला गेल्यावर याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. कारण जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी घेत असता. आणि तुम्ही अधिक कॅलरी असलेला आहार घेता तेव्हा पचन तंत्रांवर अधिक जोर पडतो.

भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यानेच पुढे लठ्ठपणाची समस्या होते. तुम्हीही असंच काहीसं करत असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पद्धत वेळीच बंद करा. काही रिसर्चमधूनही ही बाब समोर आली की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.

रात्रीच्या जेवणात काय असावं? - वजन कमी करणाऱ्यांना पडणार हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर फार चिंतेची बाब नाही. कारण याचं उत्तर सोपं आहे. रात्री जेवण हे नेहमी पचायला हलकं असंच करावं. ही बाब तुम्हाला कळाली तर तुम्ही भात आणि चपाती यातील निवड करण्यास मोकळे होऊ शकता.

डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

रात्री भात का खाऊ नये? - भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो.

अनेकांना भाताची अ‍ॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.