जमावाने केलेल्या मारहाणीने तीन गुंड ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:11 AM2018-09-09T04:11:25+5:302018-09-09T04:11:36+5:30

बेगुसराय जिल्ह्याच्या चौराही गावात एका ११ वर्षांच्या विद्यार्थिनीस पळवून नेण्यासाठी आलेल्या चार गुंडांपैकी तिघांना जमावाने बेदम मारहाण करून ठार केले.

Three assailants have been killed by the mob assault | जमावाने केलेल्या मारहाणीने तीन गुंड ठार

जमावाने केलेल्या मारहाणीने तीन गुंड ठार

googlenewsNext

पाटणा: बेगुसराय जिल्ह्याच्या चौराही गावात एका ११ वर्षांच्या विद्यार्थिनीस पळवून नेण्यासाठी आलेल्या चार गुंडांपैकी तिघांना जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. ही थरारात घटना शुक्रवारी दुपारी घडली.
या प्रकाराची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक आदित्य कुमार म्हणाले की, हे चार गुंड मोटरसायकलींवरून शाळेत आले. नंतर थेट शाळेच्या आॅफिसमध्ये जाऊन या मुलीची चौकशी करू लागले. ती मुलगी शाळेत आलेली नाही, असे मुख्याध्यापिकेने त्यांना सांगितल्यावर या चौघांपैकी एकाने पिस्तुल काढून तिला धमकावले. त्यामुळे घाबरलेली मुख्याध्यापिका भोवळ येऊन खाली पडली. हा प्रकार पाहताच शाळेतील मुलांनी एकच आरडाओरडा सुरु केला.
हा गोंधळ बाजूच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांना ऐकू आला. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी या महिला शाळेत धावतच आल्या. गुंडांनी शाळेत घातलेला गोंधळ लक्षात येताच महिला सरसावल्या व त्यांनी या गुंडांना घेरून अडकवून ठेवले. थोड्याच वेळात आणखी गावकरीही तिथे आले. जमावाने या चार गुंडांना बेदम चोपले. पोलीस येईपर्यंत चौघांपैकी तीन गुंड गतप्राण झाले होते. चौथा मात्र येथून पळून गेला. (वृत्तसंस्था)

Web Title: Three assailants have been killed by the mob assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू