'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 02:42 PM2018-12-12T14:42:49+5:302018-12-12T14:50:29+5:30

शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे.

shivraj singh chouhan resignation cm governor bjp defeat | 'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

ठळक मुद्देआता मी मुक्त झालोय - शिवराज सिंह चौहानपराभवाची जबाबदारी पूर्णतः माझीच - शिवराज सिंह चौहान

भोपाळ - शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, ही बाब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

'अब मैं आजाद हूँ', अशी प्रतिक्रिया चौहान यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ''भाजपा कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. पराभवाची जबाबदारी पूर्णतः माझी आहे'', असेही त्यांनी म्हटलं. 

 'ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्‍य पथ पर जो भी मिले, ये भी सही वह भी सही।', पत्रकारांसोबत बोलताना चौहान यांनी ही कविताही बोलून दाखवली. 


मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे. 


दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावलं होते. यानुसार, काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश आहे.




 



 



 

Web Title: shivraj singh chouhan resignation cm governor bjp defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.