20 महिन्यांतच फुटला महागठबंधनाचा फुगा, भाजपा ठरणार किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 09:34 PM2017-07-26T21:34:23+5:302017-07-26T22:54:02+5:30

राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाल्याचं मानलं जात आहे.

Nitish Kumar resign alliance broke in 20 months | 20 महिन्यांतच फुटला महागठबंधनाचा फुगा, भाजपा ठरणार किंगमेकर

20 महिन्यांतच फुटला महागठबंधनाचा फुगा, भाजपा ठरणार किंगमेकर

Next
ठळक मुद्देमहागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.   243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

पाटणा, दि. 26 - बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राजीनामा देऊन मोठा राजकीय भूकंप केला आहे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. यासोबतच भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेले जेडीयू-आरजेडी-काँग्रेस यांच्या महागठबंधनाचा अंत झाल्याचं मानलं जात आहे. केवळ 20 महीन्यातच बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडी तुटली आहे. आता नवं सरकार स्थापन करण्यावर विचार-मंथन केलं जाईल. यामध्ये भाजपाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण आता बिहारमध्ये भाजपाच्या मदतीशिवाय सरकार बनवणं अशक्य आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे भाजपाकडून ऑफर मिळाल्यानंतर बिहारमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजेच भाजपा किंगमेकर बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद), जनता दल यूनायटेड (जदयू)  आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महागठबंधनचं सरकार स्थापन केलं होतं. 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 आकडा गाठणं गरजेचं होतं. त्यामुळे 80 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला लालू प्रसाद यादवांचा राजद, 71 जागा मिळवून दुसरा मोठा पक्ष असलेला नितीश कुमारांचा जदयू आणि 27 जागा मिळवणा-या कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. सर्वात मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्रीपद आपल्याकडे न ठेवता लालूंनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं आणि आपला मुलगा तेजस्वी यादवा याला त्यांनी उपमुख्यमंत्री बनवलं. महाआघाडी तुटण्याचं जेव्हा-केव्हा वृत्त आलं त्यावेळी लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचं ते वारंवार म्हणाले होते. 

मात्र,  भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  पण, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.  

बिहार विधानसभेत असं बदलू शकतं गणित...
महागठबंधन तुटल्याने नितीश कुमार यांना जर पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपाची मदत घेण्याशिवाय आता पर्याय नाहीये.    243 जागा असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 जागा मिळवणं गरजेचं आहे. नितीशकुमार भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेल्यास जदयूच्या 71 आणि भाजपाच्या 53 मिळून दोघांच्या 124  जागा होतील. 

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य)
राष्ट्रीय जनता दल (राजद) – 80
जनता दल यूनायटेड (जदयू) – 71
काँग्रेस – 27
भाजप (विरोधी पक्ष) – 53
सीपीआय – 3
लोक जनशक्ती पार्टी – 2
राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
अपक्ष – 4

Web Title: Nitish Kumar resign alliance broke in 20 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.