देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 04:43 PM2017-11-02T16:43:01+5:302017-11-02T16:48:44+5:30

जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Most states in the country get salary and holidays | देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

Next

नवी दिल्ली- जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या तुलनेत नवी दिल्लीत काम केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. परंतु दिल्लीत तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात.

सुट्ट्यांसाठी मुंबई सर्वात चांगलं ठिकाण आहे. मुंबईतल्या कंपन्या दिल्लीतील कंपन्यांपेक्षा नोकरदारांना जास्त सुट्ट्या देतात. मात्र तुम्हाला जास्त पगार हवा असल्यास तुम्ही नवी दिल्लीलाच प्राथमिकता द्याल. नवी दिल्लीत मिळणारा जास्त पगार हा मुद्दा गौन असून, मुंबईतले नोकरदार हे अधिक कौशल्यपूर्ण काम करत असल्याचा निष्कर्षही वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून मांडण्यात आला आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत 60 टक्के जास्त पगार मिळतो. नवी दिल्लीतल्या एखाद्या सुपरमार्केटमधल्या कॅशिअरलाही कमीत कमी महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. तर त्या तुलनेत मुंबईत अशा प्रकारचं काम करणा-याला 8650 रुपये इतका महिन्याकाठी पगार मिळतो. तो पगार दिल्लीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी आहे.

मुंबईतल्या कंपन्या 21 सुट्ट्या भरपगारी देतात. तर दिल्लीत फक्त 15 सुट्ट्या भरपगारी मिळतात. दिल्लीतल्या कामगारांना जास्त पगार असल्यामुळे जास्त दिवस काम करावं लागतं. परंतु सुपरमार्केटमधल्या कामाचं मूल्यमापन केल्यास दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काम करणा-याला जास्त फायदा मिळतो. मुंबईत किमान वेतन इतर विकसनशील देशांच्या तुलनेत फार कमी आहे. जसं की मॅक्सिको सिटी(152डॉलर), व्हिएतनाम (168 डॉलर), कुवेत (199 डॉलर) आहे. तसेच बँकॉक, शांघाई, जकार्ता, क्वालालांपूर व मनीला या देशांतील मजुरीही तुलनेत जास्त आहे. 

सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच,याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत त्या वर्षाला नव्हे, तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ देतात. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.
नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणताही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

Web Title: Most states in the country get salary and holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.