आपलं एक मत अमूल्य, तर बोटावरील एक थेंब शाईची किंमत कोटींच्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:12 PM2019-03-25T14:12:21+5:302019-03-25T14:17:03+5:30

केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई

lok sabha elections 2019 - Indelible Ink For Loksabha elections Ordered By Election Commission | आपलं एक मत अमूल्य, तर बोटावरील एक थेंब शाईची किंमत कोटींच्या घरात!

आपलं एक मत अमूल्य, तर बोटावरील एक थेंब शाईची किंमत कोटींच्या घरात!

Next

म्हैसूर - केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालेलं आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचं असतं ती म्हणजे मतदान केल्यानंतर मतदाताच्या बोटावरची निळी शाई. तुम्हाला माहिती आहे का ? या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 लाख बाटल्यांची ऑर्डर दिली आहे. देशभरात 90 कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या 26 लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास 33 करोड रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 11 एप्रिलपासून सुरुवात होतेय, 7 टप्प्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून 19 मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. 23 मे रोजी मतदान मोजणी करण्यात येणार आहे.

2009 च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीनपटीने वाढ झाली आहे. 2009 मध्ये निळ्या शाईची किंमत 12 करोड रुपये होती. तर मागील 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत. एका बाटलीमध्ये 10 मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान 350 मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू शकतो. 

2004 च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाताच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता.मात्र 2006 रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ लाईन आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वांत जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो. याठिकाणी 3 लाख बाटल्यांचा वापर करण्यात येतो. तर सर्वांत कमी बाटल्या लक्षद्वीप या राज्यात वापरण्यात येतात. याठिकाणी 200 बाटल्यांचा वापर होतो. 
मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.  

म्हैसूरची शाई  
ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् अ‍ॅण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार होते. या कंपनीकडून जगातील 25 देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखले जाते.
 

Web Title: lok sabha elections 2019 - Indelible Ink For Loksabha elections Ordered By Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.