'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 08:47 AM2018-02-16T08:47:06+5:302018-02-16T09:14:25+5:30

लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु...

khil-bharatiya-sant-parishad-naitonal-convener-narsimha-saraswati-said-produce-4-kids-to-protect-hinduism | 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं, सांभाळ आम्ही करू'' 

Next

नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी 'प्रत्येक हिंदूनं 5 मुलांना जन्माला घालावं,  सांभाळ आम्ही करू'' असे अजब वक्तव्य केलं आहे. देशातील लोकसंख्येवर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरस्वती महाराज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर टिका होतायत. सरस्वती महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना आरोप केला आहे की, लोकशाहीचा वापर करत काही लोक आपली लोकसंख्या वाढवून देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूकडून संपुर्ण जग हिसकावण्यात आले आहे आणि भारत हिंदूसाठी शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती लोकसंख्या नियंत्रित न केल्यास गृहयुद्ध निर्माण होईल असेही ते म्हणाले आहेत. 

स्वत:ला अखिल भारतीय संत परिषदेचे राष्ट्रीय संयोजक म्हणवून घेणारे नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी वाढत्या लोकसंख्येसाठी एका विशिष्ट समाजाला जबाबदार धरताना त्यांनी प्रत्येक हिंदूंना किमान चार ते पाच मुले जन्माला घाला, जर तुम्हाला  त्या मुलांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर ती मुले आमच्याकडे सोपवावी, त्यांचा आम्ही सांभाळ करु असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

जोपर्यंत भारत सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी एखादा कठोर कायदा करत नाही तोपर्यंत  हिंदूंना तोपर्यंत आपली लोकसंख्या कमी होऊन द्यायची नाही. किमान चार ते पाच मुले प्रत्येक हिंदूने जन्माला घातली पाहिजे. आपण ऐवढी मुले सांभाळू शकत नाही असे म्हणणा-यांनी मुले जन्माला घालून आम्हा संन्याशांकडे सोपवावीत, त्यांचा आम्ही सांभाळ करु. त्यांच्यासाठी आम्ही गुरुकूल सुरु केले आहेत, तिथे त्यांचे शिक्षणही पुर्ण करु. असे वक्तव्य नरसिम्हा सरस्वती महाराज यांनी केलं आहे.  

Web Title: khil-bharatiya-sant-parishad-naitonal-convener-narsimha-saraswati-said-produce-4-kids-to-protect-hinduism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.