निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:08 AM2017-12-08T11:08:10+5:302017-12-08T11:11:47+5:30

शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

Childless couple now parents of 51 kids | निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

Next
ठळक मुद्देमुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर मुझफ्फरनगरमधील दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहेशेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

मुझफ्परनगर - कधीतरी आयुष्यात अशी एखादी पोकळी असते ज्यामुळे संपुर्ण आयुष्यच पालटून जातं. एकेकाळी पोकळी वाटणारी निर्माण करणारी ही गोष्ट आपल्याला समृद्ध करुन टाकते. असंच काहीसं मुझफ्फरनगरमधील एका दांपत्यासोबत घडलं आहे. शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर या दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहे. 

शामली येथील कुदाना गावातील मीना राणा यांचं 1981 मध्ये बाघतपच्या विरेंद्र राणा यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 10 वर्षानंतरही त्यांना मुल होत नव्हतं. मूल व्हावं यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या फे-या मारल्या, पण काहीच फायदा झाला नाही. तपासणीअंती मीना कधीच आई होऊ शकत नाहीत असं निष्पन्न झालं. 1990 साली दोघेही शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले. येथे दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलं. मांगेराम असं त्याचं नामकरण केलं. पण त्यांच्या नशिबाचा खेळ अद्याप संपला नव्हता. पाच वर्षांनी मांगेरामचं निधन झालं आणि नशिबाने पुन्हा एकदा त्यांची परिक्षा घेण्याचं ठरवलं. पण दोघांनीही हार मानायची नाही असा निश्चयच केला होता. दोघांनीही निराधार मुलांना आपल्या घरी आश्रय देण्यास सुरुवात केली. 

शुक्रताल येथे दांपत्याला आठ एकर जमीन देणगीत मिळाली होती. या जमिनीवर त्यांनी अनाथाश्रम सुरु केला असून मुलांचा सांभाळ करतात. येथे त्यांनी एक शाळाही सुरु केली आहे. सध्या येथे 46 मुलं आहेत. दांपत्याच्या मदतीने काहीजण आज मोठ्या कंपनीत रुजू झाले आहेत. काहीजण नोकरीसाठी शहराबाहेर पडली आहेत. अनेकांचं लग्नही त्यांनी लावून दिलं. हे सर्व त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त देणगींच्या मदतीने. 

आपली मुलं हिंदू आहेत की मुस्लिम याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं मीना सांगतात. त्या सांगतात, 'ही मुलं माझी आहे फक्त एवढंच मला माहिती आहे'. सध्या त्यांच्याकडे एकूण 46 मुलं असून यामध्ये 19 मुली आणि 27 मुलं आहेत. यामधील अनेकजण अपंग आहेत. अनाथाश्रममध्ये मुलांना खेळण्यासाठी एक मोठं मैदानही तयार करण्यात आलं आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, किचनदेखील भलंमोठं आहे. 

शुक्रताल ग्रामपंचायतीने आपल्या जमिनीचा मोठा तुकडा दिला होता. अनेक महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींसाठी आपल्याला देणगीवरच अवलंबून राहावं लागतं. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात असं विरेंद्र सांगतात. येथे राहणारी 22 वर्षीय ममता आता जिल्ह्यातील एका कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्यूएट करत आहे. जर मीना आणि विरेंद्र यांनी आपला सांभाळ केला नसता, तर आपण आज कुठे असतो, आपल्या भविष्याचं काय झालं असतं माहित नाही असं ममता सांगते. सतत तक्रार करणा-यांसाठी मीना आणि विरेंद्र एक आदर्शच आहे. 

Web Title: Childless couple now parents of 51 kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार