यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:10 AM2018-01-10T00:10:54+5:302018-01-10T00:14:14+5:30

This year, the Bham Dhan dam | यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

Next
ठळक मुद्दे४३० कुटुंबांचे स्थलांतर महिनाअखेर ताबा जलसंपदा विभागाकडे

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.
साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले.
परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रुपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमिनीवर असलेली पिके, घर, गोठ्यांचेही मूल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादित करण्यात आली. परंतु पुनर्वसनाच्या प्रश्नी काम धीम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पूर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनर्वसनासाठी धरणाच्या बाजूलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादित करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणाºया खर्चातही दरवर्षी वाढ होत होती. ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे.
प्रोत्साहन अनुदान
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.नाशिकला पाणी मिळण्याविषयी साशंकता
साधारणत: २.६० टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या भाम धरणातील पाणी दारणा धरणातून नांदूरमधमेश्वरमार्गे नगर व मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे. नाशिक शहराला या पाण्याचा लाभ होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असली तरी, जनभावना लक्षात घेता जलसंपदा विभाग नाशिक जिल्ह्याला या धरणातून पाणी मिळेल असा दावा करीत असून, नेमके किती व कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट झालेले नाही.

Web Title: This year, the Bham Dhan dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण