मनमाड-नगर मार्गावर अपघातात सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:28 AM2018-11-22T01:28:05+5:302018-11-22T01:28:31+5:30

मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे.

  Six killed in road accident on Manmad-Nagar road | मनमाड-नगर मार्गावर अपघातात सहा ठार

मनमाड-नगर मार्गावर अपघातात सहा ठार

googlenewsNext

येवला : मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे. अपघातात ठार झालेले पाचजण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी आहेत, तर एक महिला इंदूर येथील आहे. अपघातानंतर आयशरचालक फरार झाला आहे. टेम्पो (क्र . एचआर ४५ ए ७०७०) व इर्टिका कार (क्र. एमएच १७ बीएल १८८१) यांच्यात धडक होऊन अपघात झाला. बाळासाहेब मुरलीधर अनाड (६०), इंदूबाई बाळासाहेब अनाड (५५), श्रीनाथ बाळासाहेब अनाड (२५), मोहिनी गणेश खांदवे, हरी गणेश खांदवे (५) सर्व राहणार शारदानगर, कोपरगाव आणि भीमाबाई बापू गोखले (७०) रा. इंदूर अशी मृतांची नावे आहेत.  सर्व मृतदेह येवला येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

Web Title:   Six killed in road accident on Manmad-Nagar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.