अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:22 PM2017-12-05T15:22:57+5:302017-12-05T15:28:16+5:30

गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे.

In the 'Satyamev Jayate' of Amir Khan, the choice of Chandwad, Sinnar | अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धा : जलसंधारण, मृदसंधारणाचे होणार कामेग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी

नाशिक : सिने अभिनेता अमीर खान यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणी टंचाईचा सामना करणा-या चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पाणी फाऊंडेशनच्यावतीने ‘वॉटर कप’स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणा-या राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणा-या ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाऊंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणा-या ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाऊंडेशनला कळवायची असून, फाऊंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाऊंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे, या शिबीरात सहभागी होणा-या शिबीरार्थींचा प्रवास, राहण्याची खाण्याची व निवासाची सोय फाऊं डेशन करणार असून, शिबीरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे करायची आहेत, या कामांसाठी मात्र फाऊंडेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन ही कामे पुर्ण करावी लागणार असून, पाणी फाऊंडेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखाचे पारितोषित दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षिस देण्यात येईल.

Web Title: In the 'Satyamev Jayate' of Amir Khan, the choice of Chandwad, Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.