किरकोळ वादातून महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:40 PM2019-07-22T12:40:40+5:302019-07-22T12:40:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणीचा वळवीपाडा येथे किरकोळ वादातून तिघां महिलांसह युवकाला मारहाण करण्यात आली़ 19 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणीचा वळवीपाडा येथे किरकोळ वादातून तिघां महिलांसह युवकाला मारहाण करण्यात आली़ 19 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़
खडकापाणीचा वळवीपाडा येथील मिराबाई विजय वसावे यांच्यासोबत अमरसिंग सोत्या वसावे यांच्यासह त्याच्या कुटूंबियांनी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला होता़ यातून अमरसिंग वसावे, बोद्या छोटय़ा वसावे, टेंब:या छोटय़ा वसावे, रमेश दामा वसावे, गुलाबसिंग दामा वसावे यांनी मिराबाई यांच्यासह त्यांची मुलगी सिता आणि सनोरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी तिघांचा बचाव करण्यासाठी आलेल्या मिराबाई यांचा पुतण्या कंचन नरशी वळवी याला मारहाण करण्यात आली़ याप्रकरणी मिराबाई यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे अमरसिंग, बोद्या, टेंब:या, रमेश आणि गुलाबसिंग वसावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़