कंधार तालुक्यात नऊ दिवसांत ४ हजार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:29 AM2018-02-25T00:29:54+5:302018-02-25T00:30:24+5:30

तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.

 4 thousand toilets in Kandhar taluka in nine days | कंधार तालुक्यात नऊ दिवसांत ४ हजार शौचालय

कंधार तालुक्यात नऊ दिवसांत ४ हजार शौचालय

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्यात ५९ गवांत शौचालय (वैयक्तिक) बांधकाम करण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसले. अवघ्या नऊ दिवसांत ३ हजार ९६७ बांधकाम पूर्ण करण्याची किमया साधली. त्यामुळे पाणंदमुक्त गावाची संख्या ९४ झाली असून शिल्लक २२ गावांनी ५ हजार ६१८ शौचालय बांधकाम पूर्ण केल्यास तालुका पाणंदमुक्त होणार आहे. त्यासाठी कामाची गती अशीच राहणे आवश्यक आहे.
तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीने मोठे नियोजन केले. अनेक समस्यांना सामोरे जाताना दमछाक झाली. निधीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर कामांना खीळ बसली. वरिष्ठ पातळीवरुन निधी उपलब्ध झाला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील निधीचा वापर (चौदावा वित्त आयोग) करण्यास मुभा देण्यात आली. १५ फेब्रुवारीपर्यंत पाणंदमुक्त तालुका करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थ व अधिकारी-कर्मचारी समन्वयाने अडथळ्यावर मात करण्यासाठी सरसावले आणि त्याला यश मिळू लागले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कामे गतीने झाली.
१५ ते २३ फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत ५९ गावांत ३ हजार ९६७ शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली. रेतीचे गगनाला भिडलेले भाव, पाण्याचा प्रश्न आदींवर मात करण्याचा करीत ३५ गावे पाणंदमुक्त करण्यात यश आले. त्यामुळे तालुक्यातील पाणंदमुक्त गावाची संख्या आता ९४ झाली. आता संपूर्ण ११६ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी यंत्रणा तत्परतेने कार्यरत झाली आहे.
तालुक्यातील ११६ पैकी ९४ गावे पाणंदमुक्त झाली आहेत. त्यातील ९ गावे ओडीएफ झाली असून आॅनलाईन दिसत नसल्याची माहिती पंचायतच्या सूत्रांनी दिली. अशामध्ये बामणी, धानोरा (कौठा), तेलूर, दिग्रस (बु), दिग्रस (खु), नंदनवन, उमरज, वहाद आणि येलूर गावांचा समावेश आहे. अजून २२ गावे पाणंदमुक्त करण्यासाठी मोठी धांदल सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राबविण्याचा संकल्प तडीला नेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.
आता तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी अत्यल्प अवधी लागणार आहे. २२ गावांतील शिल्लक बांधकामे करण्यावर जोर दिला जात आहे. त्यात आंबुलगा १७५, औराळ १०३, बाचोटी १८९, बोरी बु. ११७, चिखली २५७, दहीकळंबा १९२, गऊळ २१० घोडज, २६५, गोणार २८६ गुंटूर २०२, कल्हाळी १६७, खंडगाव (ह) २०९, कुरुळा ५२६, मंगलसांगवी १३५, मसलगा ३१०, नागलगाव १७३, पानभोसी २७२, फुलवळ २०९, पेठवडज ८०९, शेकापूर १२३, शिराढोण ११३ आणि उस्माननगर ५७३ असे ५ हजार ६१८ शिल्लक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ ं

Web Title:  4 thousand toilets in Kandhar taluka in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.