मुख्यमंत्र्यांनीच राजकीय भ्रष्टाचार केला - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:49 AM2019-06-24T06:49:18+5:302019-06-24T06:49:31+5:30

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदे देऊन राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

 The Chief Minister only made political corruption - Prithviraj Chavan | मुख्यमंत्र्यांनीच राजकीय भ्रष्टाचार केला - पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांनीच राजकीय भ्रष्टाचार केला - पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext

नाशिक : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदे देऊन राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अशाप्रकारे भाजपात आणून त्यांना मंत्रिपद देणे एकप्रकारे लाच देण्याचाच प्रकार असून, घटनाबाह्यह्ण असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस सोडून भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे हे घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात अपवादात्मक परिस्थिती नसताना विखे व क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. विशेष म्हणजे पक्षांतर झालेले असताना त्यांना पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्रिपद देण्याची तरतूद आहे. मात्र सरकारचा कार्यकाल संपणार असल्याने पोटनिवडणूक होण्याची शक्यता नसताना मुख्यमंत्र्यांनी या दोन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे घटनेतील ९१व्या घटना दुरुस्तीच्या दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन असल्याचा आरोप करतानाच त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रिपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
या प्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

वंचित आघाडीसोबत चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असून, सोबत वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title:  The Chief Minister only made political corruption - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.