"'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:53 PM2021-11-11T12:53:59+5:302021-11-11T12:58:02+5:30

BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik : भाजपाने नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं" असं सणसणीत टोला लगावला आहे.

BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik And Shivsena Sanjay Raut | "'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?"

"'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?"

Next

मुंबई - अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची फटाकेबाजी दिवाळीनंतरही सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, असा आरोप मलिक यांनी बुधवारी केला. तर त्यावर फडणवीस यांनी ‘एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला घाण लागते आणि समोरच्याला मात्र घाणीत खेळायला आवडते,’ अशा शब्दांत उत्तर दिले. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी "चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं आहे. याला आता भाजपाने उत्तर दिलं आहे. 

भाजपाने नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सत्य हे अस्तित्वातच असतं. असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं" असं सणसणीत टोला लगावला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी "'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं; आता तुम्हीच ठरवा चिखलात कोणाला लोळवलं?" असा सवाल विचारला आहे. केशव उपाध्ये यांनी "सत्य हे अस्तित्वातच असतं! असत्य हे सतत पटवून द्यावं लागतं... म्हणूनच ३० वर 'नवाबी' पत्रपरिषदांना एकच पण 'सॉलिड' उत्तर दिलं गेलं! आता तुम्हीच ठरवा चिखलात कोण लोळत होतं? (तसंही रोज सकाळी दिसला बुम की चिखलफेक करत हे अख्ख्या महाराष्ट्राला ठावूक आहेच की)" असं म्हटलं आहे. 

फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

प्रख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडविली. या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.‘मी फार पूर्वीच शिकलो की, एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला घाण लागते आणि त्याला मात्र घाणीत खेळायला आवडते’ हा जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या वाक्याचा आशय फडणवीस यांनी ट्विट केला. मलिक यांनी आरोपांची घाण उडविली असली तरी आपण त्याला उत्तर देणार नाही, असे फडणवीस यांनी सूचित केले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मलिक यांच्या आरोपांना आशिष शेलार यांनी समर्पक उत्तर दिलेले आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व या आरोपांना देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

केशव उपाध्ये यांनी याआधी "अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच" असं म्हटलं आहे.

 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Nawab Malik And Shivsena Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.