एसीबीचे ३९५ सापळे यशस्वी

By admin | Published: June 27, 2017 01:53 AM2017-06-27T01:53:09+5:302017-06-27T01:53:09+5:30

राज्यभरात एसीबीने गत सहा महिन्यांत ३९५ सापळे यशस्वी करून अनेक लाचखोरांना जेरबंद केले आहे. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग

ACB's 395 traps were successful | एसीबीचे ३९५ सापळे यशस्वी

एसीबीचे ३९५ सापळे यशस्वी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभरात एसीबीने गत सहा महिन्यांत ३९५ सापळे यशस्वी करून अनेक लाचखोरांना जेरबंद केले आहे. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग पहिल्या, तर पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते २२ जून २०१७ दरम्यान राज्यातील एकूण आठ विभागांत ३९५ यशस्वी सापळे रचण्यात आले. याशिवाय अपसंपदाचे ६ आणि भ्रष्टाचाराच्या १४ प्रकरणांमध्येही ट्रॅप रचण्यात आले. मुंबई विभागात १३, ठाणे ५०, पुणे ९४, नाशिक ५९, नागपूर ४७, अमरावती ३६, औरंगाबाद ५३, तर नांदेड विभागात ४३ असे सापळे यशस्वी करण्यात आले आहेत.

Web Title: ACB's 395 traps were successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.