केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:45 PM2018-10-14T23:45:13+5:302018-10-14T23:45:22+5:30

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान ...

Sugar growers lose Rs 1600 cr annually due to Center: Raju Shetty | केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

Next

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याने अद्दल घडविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
इचलकरंजी येथे शनिवारी रात्री भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा या विषयावर आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने राजू शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही अशी टीका दोन्ही सरकारमधील भाजप नेते करत आहेत. मात्र, २०० रुपयांची वाढ, अशी फसवी घोषणा केली. सरकारने प्रत्यक्षात २०० रुपयांची वाढ दिल्याचे सांगत असले तरी रिकव्हरीचा ९.५ टक्के असलेला बेस दहा टक्के केला आहे. त्यामुळे शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे.
वस्त्रोद्योगासाठी लढा उभारणार
शेट्टी म्हणाले, भाजप सरकारने वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनविली आहे. वीज दर कमी केले म्हणून तीनवेळा भाजप नेत्यांनी साखर वाटली. ही साखर वाटून लोकांची साखर वाढली. मात्र, वीज दर कमी झाले नाहीत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, त्याही आजतागायत पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात यंत्रमागधारकांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
चंद्रकांत पाटील यांनीच माझ्याविरुद्ध लढावे
राजू शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी माझ्याविरोधात नव्या उमेदवारांची नावे घोषित करीत बसण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

Web Title: Sugar growers lose Rs 1600 cr annually due to Center: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.