कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 12:53 PM2018-01-26T12:53:06+5:302018-01-26T17:14:14+5:30

कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.

accident on Kolhapur-Ratnagiri route; Death of three people | कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंब्याजवळ कार अपघातात पाच ठार, तीघे जखमी; गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जाताना घडली घटना

Next

कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जात असताना आंब्याजवळील अपघाती वळणावर कार आदळून अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलं, दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तळवडे वळणावर हा अपघात झाला. संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दिपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा (वय 5 वर्ष) ही पाच मृतांची नाव आहेत. तर चालक प्रशांत पाटणकर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. 

हडपसर (पूणे) येथील राऊत, शेळकंदे कुटुंब शुक्रवारी सकाळी गणपतीपुळ्याला दर्शनासाठी निघाले होते. दोन कुटुंब त्यांच्या मुलांसह सलग सुट्यांमुळे कोकणात देवदर्शनाला निघाले होते. मलकापूरनंतर आंब्याजवळ गाडी येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडावर आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन लहान मुलांचा मलकापूर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

 

 

Web Title: accident on Kolhapur-Ratnagiri route; Death of three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.