घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:11 PM2018-06-02T21:11:57+5:302018-06-02T21:11:57+5:30

शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण, बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

Finding a Solution on Solution | घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना

घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा सापडेना

Next
ठळक मुद्देबघावे तेथे कचऱ्याचे ढीग : नगर परिषदेकडे अद्याप जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण, बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत चालला असून आणखी किती दिवस असे वावरावे लागणार असा सवाल आता शहरवासी करू लागले आहेत.
जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर पंचायती आपल्या पायावर उभ्या होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. स्वच्छतेसाठी नगर पंचायतींमध्ये नवनवे प्रयोग राबविले जात असून त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. कारण शहरातील कचऱ्याची स्थिती आता बारमाहीच झालेली आहे. दिवस उजाडत चालले आहेत मात्र शहरवासीयांना घाणीच्या विळख्यात श्वास घ्यावा लागत आहे.
बघावे तेथे कचºयाचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे. यातून स्वच्छतेसाठी पाहिजे तसे प्रयत्न होत आहे की नाही असा प्रश्न पडतो. ते काही असो, मात्र या सर्वांचा त्रास शहरवासी भोगत आहेत. यातून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग कोठेतरी कमकूवत पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजघडीला शहरवासीयांचा नगर परिषद व निवडून दिलेल्या नगरसेवकांवरून विश्वास उडत चालला आहे.
कचºयाचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप, कचऱ्यातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे. अशा या वातावरणात शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे. यावर मात्र नगर परिषदेकडून तोडगा काढणे कठीण दिसत आहे. यामुळेच शहराचे वातावरण दिवसेंदिवस दिवस प्रदुषीत होत चाचले असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यात यावा अशी ओरड शहरवासी करीत आहेत.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही
नव्याने तयार करण्यात आलेल्या नगर पंचायत आता आपले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करीत आहेत. असे असताना गोंदिया नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी घनक चऱ्यांची विल्हेवाट लावताना नगर परिषदेचीही कोंडी होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पाची नितांत गरज आहे. मात्र नगर परिषदेकडे सध्यातरी यावर काहीच तोडगा नसल्याचेही दिसते कारण नगर परिषदेकडे प्रकल्पासाठी अद्याप जागाच नाही. अशात जागा कधी घेणार व कधी प्रकल्प सुरू केला जाणार हे सध्या स्पष्ट नाही. तोवर आहे त्या स्थितीतच शहरवासीयांना रहावे लागणार आहे.

Web Title: Finding a Solution on Solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.