ट्रकची दुचाकीला धडक; दोन युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:44 AM2017-12-06T00:44:37+5:302017-12-06T00:44:43+5:30
औरंगाबाद - कन्नड महामार्गावरील गल्लेबोरगावनजीक पेट्रोलपंपासमोर ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. मयत युवक हे कन्नड तालुक्यातील उपळा गावचे रहिवासी असून या गावावर शोककळा पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : औरंगाबाद - कन्नड महामार्गावरील गल्लेबोरगावनजीक पेट्रोलपंपासमोर ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. मयत युवक हे कन्नड तालुक्यातील उपळा गावचे रहिवासी असून या गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत खुलताबाद राज्य महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी सांगितले की, शंकर पांडुरंग नीळ (३२) व आजिनाथ काशीनाथ निकम (३०, दोघे रा. उपळा) हे आपल्या मोटरसायकल क्र. एम.एच. २०- एएच -९९१२ ने औरंगाबादहून कन्नडकडे जात असताना कन्नडहून औरंगाबादकडे जाणाºया ट्रकने (क्र. टी.एन. ५२- जे- ०४९७) मोटारसायकलस्वारांना जोरदार धडक दिल्याने शंकर व अजिनाथ गंभीर जखमी झाले. सपोनि. नामदेव चव्हाण, पोहेकॉ. मदन राठोड, महादेव कोळी, चालक जगन्नाथ कोळी, आलापूरचे ग्रामस्थ शरद दळवी, दिलीप राजपूत, पोपट राजपूत आदींनी मदतकार्य करून जखमींना १०८ रूग्णवाहिकेत उपचारासाठी घाटी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. घटनास्थळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. बाबासाहेब थोरात, वाल्मिक कांबळे यांनी पंचनामा करून ट्रकचालकास ताब्यात घेतले व ट्रक पोलीस ठाण्यात लावला.