अधिग्रहणातील विहिरींना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:34 AM2019-06-21T01:34:43+5:302019-06-21T01:35:13+5:30

चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.

Drain of acquisitions wells | अधिग्रहणातील विहिरींना कोरड

अधिग्रहणातील विहिरींना कोरड

Next
ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली : खासगी ३७३ विहिरी अन् ६५ टँकरवर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात ३७३ खासगी विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तात्पुरता उपाय म्हणून अमरावती तालुक्यात बोडणा, परसोडा डिगरगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, मोझरी, भारवाडी, सार्सी, गुरुदेवनगर, घोटा, माळेगाव, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव आखतवाडा, पोरगव्हाण, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खुर्द, आमला, जळका, निमला, सावंगी, अमदोरी, धामणगाव तालुक्यात उसळगव्हाण, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, शिंदी, घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात सोमवारखेडा, भिलखेडा, मनभंग, आडनदी, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, भांदरी, खडीमल, कुलंगना, गौरखेडा, मोथा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोंगडा, आकी, नागापूर, एकझिरा व चौराकुंड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
उपाययोजनांची सद्यस्थिती
आराखड्यानुसार १९३९ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यापैकी ८३३ गावांच्या ९५५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६८ गावांच्या ५४० उपाययोजनांची कामे सुरू आहेत, तर ३२१ गावांच्या ४०६ उपायोजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ८ कोटी ३ लाख ६७ हजारांचा निधी अपेक्षित आहे.

१.१८ लाख नागरिकांची
मदार टँकरवर
पाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात १० तालुक्यांतील ६४ गावे व १,१८,२०२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. अमरावती तालुक्यातील तीन गावांत २४८९, तिवसा तालुक्यातील १० गावांत २७४९८,मोर्शी तालुक्यातील ११ गावांत १८१८९, वरूड तालुक्यातील एका गावात ३१९६, चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावांत १२४४५, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन गावांत २९६०, अचलपूर तालुक्यातील दोन गावांत २१५४७, चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ७५१२, चिखलदरा तालुक्यातील २६ गावांत १४८९९, धारणी तालुक्यातील एका गावांत १०५० लोकसंख्येची मदार टँकरवर आहे.

Web Title: Drain of acquisitions wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.