वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:31 PM2018-12-22T18:31:48+5:302018-12-22T18:32:07+5:30

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे.

In western vidarbha Dam's have 42 percent water | वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

वऱ्हाडातील ५०२ धरणांत ४२ टक्केच जलसाठा!

Next

अकोला : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील ५०२ धरणांत आजमितीस ४२.१२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दोन महिन्यांत यातील २१ टक्के जलसाठा घटला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर असून, अमरावती जिल्ह्यातील स्थिती बिकट आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये स्थिर होता. नोव्हेंबर महिना लागताच यामध्ये घट सुरू झाली असून, २२ डिसेंबर रोजी या सर्व धरणामध्ये एकूण ४२.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. नळगंगा धरणात १३.५९, पेनटाकळी ८.३९ जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ शून्य टक्के आहे. तोरणा ९.५१ तर उतावळी धरणातील पातळी ३६.३३ टक्के साठा आहे. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.७७ टक्के, पलढगमध्ये २५.०३ टक्के, मन धरणात २१.७२ टक्के साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६४.३४ टक्के, एकबुर्जी ६१.१५ तर सोनल धरणात ७०.३३ टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात आता केवळ २८.२८ टक्केच जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ८१.१८, अरुणावती ५७.४४ तर बेंबळा धरणात ३७.७३ टक्केच जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ६३.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ८०.६२ टक्के जलसाठा असून, उमा ६६.८७, मोर्णा धरणात ४२.४७ टक्के, तर वान धरणात ८१.८५ टक्के जलसाठा आहे.

यावर्षी वºहाडातील अकोला, वाशिम जिल्ह्यातील धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तथापि, लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात कमी जलसाठा संचयित झाला. म्हणूनच अकोला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर व नियोजन करणे गरजेचे आहे.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

Web Title: In western vidarbha Dam's have 42 percent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.