शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:44 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांची कल्पकता : कॉन्व्हेंटची मुले पुन्हा परतली गावात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत. एवढी विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची असताना काही ठिकाणी मात्र संवेदनशील शिक्षकांनी अनेक नवनवीन ऊपक्रम राबवून तथा कल्पकतेने विद्यार्थी संख्या वाढवून शाळेला झळाळी दिली आहे आणि इतर जिल्हा परिषदांच्या शाळेपुढे आदर्श निर्माण केला आहे.यामध्ये आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील जिल्हा परिषदेची ऊच्च प्राथमिक मराठी शाळा आघाडीवर आहे. या शाळेने अवघ्या चार वर्षात पटसंख्या दुप्पट करून दाखवली. चार वर्षांपूर्वी या शाळेची परिस्थिती गंभीर होती. शाळेच्या पटांगणात जनावरे बसून राहत होती. प्रांगणात झाडे नव्हती, भकास व ऊदास असे वातावरण होते. अनेकदा तर शाळा दुपारनंतर भरत सुद्धा नव्हती. यामुळे पालकांनी शाळेकडे पाठ फिरविली होती. शाळेची विद्यार्थीसंख्या रोडावत चालली होती, २०१३-१४ मध्ये तर पटसंख्या केवळ ११४ वर आली होती. आठ वर्गात फक्त ११४ विद्यार्थी राहले होते. त्याच दरम्यान या शाळेत उपक्रमशिल शिक्षक राजूदास जाधव या शाळेत रुजू झाले. त्यांनी या शाळेची अवस्था पाहली व यातून आपल्या शाळेला नंबर वन बनविण्याचा संकल्प केला.सर्वात प्रथम शाळेत सुरक्षा भिंत बांधली, पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधले, बोरवेल केली, शाळेच्या पटांगणात दोनशे विविध वृक्ष लावले. याला जोपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली. सोबतच स्वतंत्र मुत्रीघर, शौचालय, असे वेगवेगळे युनीट बांधले. शाळेतील कचºयापासून खत तयार करण्यासाठी टाके बांधले.विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग वाढला. शारीरीक विकास व्हावा, म्हणून क्रीडा स्पर्धा व सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र वाचन कक्ष, भोजनासाठी व्यवस्था, प्रत्येक वर्गात फॅन आदी सुविधा ऊपलब्ध करन्यात आल्या. खाजगी शाळेला लाजवेल असे काम या शाळेने करुन दाखवले आहे. याचाच परिणाम म्हणून २०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथमच महाळुंगी जिल्हा परिषदेच्या शाळेने आयएसओ नामांकन मिळविले.नवनवीन उपक्रमशाळेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वयंशासन, बँकींग, निवडणूक प्रक्रिया, ई-लर्निंग, स्टेज डेअरिंग, स्पर्धा परीक्षा माहिती आदी उपक्रमांचा समावेश होता.शाळेतील माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आम्ही आमच्या शाळेला हे वैभव मिळवून देऊ शकलो.- राजूदास जाधवमुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, महाळुंगी