शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:44 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांची कल्पकता : कॉन्व्हेंटची मुले पुन्हा परतली गावात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत. एवढी विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची असताना काही ठिकाणी मात्र संवेदनशील शिक्षकांनी अनेक नवनवीन ऊपक्रम राबवून तथा कल्पकतेने विद्यार्थी संख्या वाढवून शाळेला झळाळी दिली आहे आणि इतर जिल्हा परिषदांच्या शाळेपुढे आदर्श निर्माण केला आहे.यामध्ये आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील जिल्हा परिषदेची ऊच्च प्राथमिक मराठी शाळा आघाडीवर आहे. या शाळेने अवघ्या चार वर्षात पटसंख्या दुप्पट करून दाखवली. चार वर्षांपूर्वी या शाळेची परिस्थिती गंभीर होती. शाळेच्या पटांगणात जनावरे बसून राहत होती. प्रांगणात झाडे नव्हती, भकास व ऊदास असे वातावरण होते. अनेकदा तर शाळा दुपारनंतर भरत सुद्धा नव्हती. यामुळे पालकांनी शाळेकडे पाठ फिरविली होती. शाळेची विद्यार्थीसंख्या रोडावत चालली होती, २०१३-१४ मध्ये तर पटसंख्या केवळ ११४ वर आली होती. आठ वर्गात फक्त ११४ विद्यार्थी राहले होते. त्याच दरम्यान या शाळेत उपक्रमशिल शिक्षक राजूदास जाधव या शाळेत रुजू झाले. त्यांनी या शाळेची अवस्था पाहली व यातून आपल्या शाळेला नंबर वन बनविण्याचा संकल्प केला.सर्वात प्रथम शाळेत सुरक्षा भिंत बांधली, पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधले, बोरवेल केली, शाळेच्या पटांगणात दोनशे विविध वृक्ष लावले. याला जोपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली. सोबतच स्वतंत्र मुत्रीघर, शौचालय, असे वेगवेगळे युनीट बांधले. शाळेतील कचºयापासून खत तयार करण्यासाठी टाके बांधले.विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग वाढला. शारीरीक विकास व्हावा, म्हणून क्रीडा स्पर्धा व सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र वाचन कक्ष, भोजनासाठी व्यवस्था, प्रत्येक वर्गात फॅन आदी सुविधा ऊपलब्ध करन्यात आल्या. खाजगी शाळेला लाजवेल असे काम या शाळेने करुन दाखवले आहे. याचाच परिणाम म्हणून २०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथमच महाळुंगी जिल्हा परिषदेच्या शाळेने आयएसओ नामांकन मिळविले.नवनवीन उपक्रमशाळेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वयंशासन, बँकींग, निवडणूक प्रक्रिया, ई-लर्निंग, स्टेज डेअरिंग, स्पर्धा परीक्षा माहिती आदी उपक्रमांचा समावेश होता.शाळेतील माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आम्ही आमच्या शाळेला हे वैभव मिळवून देऊ शकलो.- राजूदास जाधवमुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, महाळुंगी