शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या झाली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:44 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांची कल्पकता : कॉन्व्हेंटची मुले पुन्हा परतली गावात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत. एवढी विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची असताना काही ठिकाणी मात्र संवेदनशील शिक्षकांनी अनेक नवनवीन ऊपक्रम राबवून तथा कल्पकतेने विद्यार्थी संख्या वाढवून शाळेला झळाळी दिली आहे आणि इतर जिल्हा परिषदांच्या शाळेपुढे आदर्श निर्माण केला आहे.यामध्ये आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील जिल्हा परिषदेची ऊच्च प्राथमिक मराठी शाळा आघाडीवर आहे. या शाळेने अवघ्या चार वर्षात पटसंख्या दुप्पट करून दाखवली. चार वर्षांपूर्वी या शाळेची परिस्थिती गंभीर होती. शाळेच्या पटांगणात जनावरे बसून राहत होती. प्रांगणात झाडे नव्हती, भकास व ऊदास असे वातावरण होते. अनेकदा तर शाळा दुपारनंतर भरत सुद्धा नव्हती. यामुळे पालकांनी शाळेकडे पाठ फिरविली होती. शाळेची विद्यार्थीसंख्या रोडावत चालली होती, २०१३-१४ मध्ये तर पटसंख्या केवळ ११४ वर आली होती. आठ वर्गात फक्त ११४ विद्यार्थी राहले होते. त्याच दरम्यान या शाळेत उपक्रमशिल शिक्षक राजूदास जाधव या शाळेत रुजू झाले. त्यांनी या शाळेची अवस्था पाहली व यातून आपल्या शाळेला नंबर वन बनविण्याचा संकल्प केला.सर्वात प्रथम शाळेत सुरक्षा भिंत बांधली, पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधले, बोरवेल केली, शाळेच्या पटांगणात दोनशे विविध वृक्ष लावले. याला जोपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली. सोबतच स्वतंत्र मुत्रीघर, शौचालय, असे वेगवेगळे युनीट बांधले. शाळेतील कचºयापासून खत तयार करण्यासाठी टाके बांधले.विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग वाढला. शारीरीक विकास व्हावा, म्हणून क्रीडा स्पर्धा व सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र वाचन कक्ष, भोजनासाठी व्यवस्था, प्रत्येक वर्गात फॅन आदी सुविधा ऊपलब्ध करन्यात आल्या. खाजगी शाळेला लाजवेल असे काम या शाळेने करुन दाखवले आहे. याचाच परिणाम म्हणून २०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथमच महाळुंगी जिल्हा परिषदेच्या शाळेने आयएसओ नामांकन मिळविले.नवनवीन उपक्रमशाळेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वयंशासन, बँकींग, निवडणूक प्रक्रिया, ई-लर्निंग, स्टेज डेअरिंग, स्पर्धा परीक्षा माहिती आदी उपक्रमांचा समावेश होता.शाळेतील माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आम्ही आमच्या शाळेला हे वैभव मिळवून देऊ शकलो.- राजूदास जाधवमुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, महाळुंगी