शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जिल्हा परिषदेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 22:24 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात.

ठळक मुद्देयाद्या तयार : मुहूर्ताची प्रतीक्षा, शासनाच्या आदेशाकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मेपूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे.ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेने पार पाडल्या जातात. शिक्षकांसाठी विविध गट निर्माण केले आहे. त्यानुसार अर्ज सादर केल्यानंतर त्यांना बदली दिली जाते. तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्याही बदल्या आॅनलाईन पद्धतीने केल्या जातात. बदल्यांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार केल्या आहे. प्रत्येक विभागाने बदलीपात्रची यादी तयार करून वरिष्ठांकडे सादर केली आहे. शिक्षण विभागानेही बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या या आधीच पंचायत समितीकडून मागविल्या होत्या. त्यानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहे.आरोग्य विभागानेही बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार ठेवली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारितील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त, बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण आदी विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांच्या याद्या तयार केल्या आहे. मात्र अद्यापही शासनाकडून बदल्यासंबंधी कोणतेही निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहे.आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते. आता आचारसंहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसात शासन तथा ग्रामविकास विभागाकडून बदलीसंबंधाने आदेश येण्याची शक्यता जिल्हा परिषदेतील जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचेच शासनाच्या आदेशाकडे डोळे लागले आहे.काही प्रस्ताव परत पाठविले१५ मे २०१४ रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णयानुसार दिव्यांग, कर्करोगी, हृदयरोगी, बायपास शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, कुमारिका, क्षयरोगी, ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी यांनी पुरावा सादर केल्यास टक्केवारीनुसार कधीही बदली करण्याचे आदेश दिले होते. मात्र असे काही प्रस्ताव डेप्यूटी सीईओंनी परत पाठविले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद