सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. यवतमाळातील तारपुरा परिसरातील युवकाने लॉकडाऊनच्या परिणामाची दाहकताच या अजार्तून मांडली आहे.कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे. अशा योजनांचा लाभार्थी नसलेल्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. माज्या सारख्या अनेकांपुढे आता जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. माझा ऑनलाईन कामाचा व्यवसाय आहे. २० मार्चपासून हे काम पूर्णत: बंद आहे. सहा सदस्य असलेल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. जवळ असलेला पैसा संपला असून आता त्यांचे पालन पोषण कसे करायचे ही समस्या आहे. अशी व्यथा मांडताना लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या काळ्याबाजाराकडेही त्याने लक्ष वेधले आहे. देशापुढील सीएए, एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटला, डबघाईस आलेल्या देशातील अर्थव्यवस्थेची समस्या संपली, पोलीस विभाग लॉकडाऊनच्या काळात, अवैध दारू, गुटखा, तंबाखू या माफियांना संरक्षण देत आहे. अवैध दारू विक्री, पानठेले जोरात सुरू असून जीवनावश्यक वस्तूही दामदुप्पट भावात विकल्या जात आहे. लॉकडाऊनचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे कुणाल चांदूरकर याने आपल्या निवेदनातून मांडले आहे.त्याच्या इच्छामरणाच्या परवानगी अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी व यवतमाळ तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी दिले आहे.
लॉकडाऊनला कंटाळून मागितले इच्छामरण; यवतमाळातील बेरोजगाराचे पंतप्रधानांकडे आर्जव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:39 IST
लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र यवतमाळातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
लॉकडाऊनला कंटाळून मागितले इच्छामरण; यवतमाळातील बेरोजगाराचे पंतप्रधानांकडे आर्जव
ठळक मुद्देउपासमार झाली असह्य