शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दारू पिल्याने युवकाचा मृत्यू, पोळ्याच्या दिवशीची घटना; गावकरी धडकले राळेगाव पोलीस ठाण्यावर

By विलास गावंडे | Updated: September 15, 2023 18:20 IST

पोळाच्या दिवसात खेड्यापाड्यात दारूचा महापूर असतो.

राळेगाव (यवतमाळ) : पोळाच्या दिवसात खेड्यापाड्यात दारूचा महापूर असतो. विषारी दारू पिल्याने वाटखेड येथील तरुण सचिन खुशालराव वाघ (२५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोळ्याच्या दिवस असल्यामुळे खुशालने रात्री भरपूर  दारू प्याली व झोपी गेला. सकाळी तो जागा का होत नाही आई-वडिलांनी पाहिले त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गावठी दारू जवळच्या गोपालनगर परिसरातून येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावातील तरुण विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडल्यामुळे ३० महिला व २० पुरुष राळेगाव ठाण्यावर धडकले. 

जोपर्यंत दारू विक्रेत्याना पकडून ठाण्यात आणत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दाखल झालेले ग्रामस्थ अकरा वाजेपर्यंत ठाण्यात ठिय्या मांडून बसून होते. ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर लक्षात घेऊन पोलिसांना आरोपींना पकडण्याकरिता वाटखेड गावाकडे पाठविले. तेव्हा ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की, वाटखेड येथील पोलीस पाटलांना गावातील अवैध दारू विक्रीबद्दल वारंवार सूचना देऊनही तक्रार करूनही पोलीस पाटील गांभीर्याने घेत नाही. सचिन वाघ हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून शेती व रोजमजुरी यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. घरातील एकुलता एक तरुण मुलाचा मृत्यू पडल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये दारू विक्री होऊ नये, गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी म्हणून ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी शहरातील लायसन धारक दारूची दुकाने बार सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहतील, असे फर्मान काढले होते, परंतु लायसनधारक दारू विक्री बंद असली तरी अवैध दारू विक्रेते मात्र अधिक सक्रिय होते,  त्यामुळेच ही घटना घडली असे बोलले जात आहे.            

 दोन वाजता वाऱ्हा येथील महिला पोहोचल्या राळेगाव पोलीस स्टेशनवर सकाळी आठ वाजता वाटखेड येथील महिलांनी तीन तास  ठिय्या मांडला. दुपारी दोन वाजता वाऱ्हा येथील २५  महिला आपल्या गावातील अवैध दारू बंद करा, अशी मागणी घेऊन राळेगाव पोलीस स्टेशनला पोहोचल्या. गावात अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. तरुण पिढी दारूच्या मागे लागून स्वतःचे जीवन संपवत आहे. आमच्या गावातील दारू त्वरित बंद करा अशा घोषणा महिला ठाण्यात देत होत्या. दरम्यान वारा येथील महिला मागल्या वर्षीच्या नंदी पोळ्याच्या दिवशी देखील एक वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलीस विभाग जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष करतात असा आरोप महिला करीत होत्या. आज पोळ्याचा दिवस बालगोपालांचे नंदी सजवण्यासाठी नेहमी महिला पुढाकार घेतात. परंतु त्यांना मात्र या पोळ्याचा आनंद घेता येत नाही. दारूमुळे त्यांना दारू बंद करण्याकरिता पोलीस स्टेशनला धाव घ्यावी लागते. पोलीस विभाग आरोपीला पकडून आणतात, थातूरमातूर कारवाई करतात आणि सोडून देतात. अवैध दारू विक्री बंद करण्यास पोलीस विभाग सपशेल अपयशी ठरत आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळPoliceपोलिस