शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:24 IST

प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात मंगळवारी दुर्गादेवी विसर्जनाला सुरुवात झाली. याच मिरवणुकीत अक्षय राठोड टोळीतील प्रवीण केराम या युवकाचा रात्री ९.३० वाजता पाच जणांनी चाकूने भोसकून खून केला. प्रवीण केराम याला वाणीपुरा येथील गल्लीत गाठून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली. या पाच जणांनी प्रवीणला घेरून चाकूने वार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी जखमी प्रवीणला शासकीय रुग्णालयात दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्रीच यातील आरोपी साहील संजय रामटेके याला अटक केली. तर दुसऱ्या दिवशी निखिल ऊर्फ पीजी गौरकर आणि वेदांत मानकर या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. हर्षल चचाने व प्रफुल्ल गजबे हे दोन आरोपी पसार आहेत. या प्रकरणी हरीश अरुण मुळे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी हत्त्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; खुनाचे सत्र सुरूचआठवडीबाजार परिसरातही बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांकडे कुणाचीही तक्रार आली नाही. ही घटनासुद्धा विसर्जन मिरवणूक वादातून घडल्याची चर्चा आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा काढण्याचे प्रकार वाढले आहे. शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. आर्णी मार्गावरही वाद झाल्याची चर्चा शहरात आहे. तेही प्रकरण पोलिसांकडे आले नाही. यावरून भविष्यात आणखी भीषण घटना घडण्याची शक्यता गुन्हेगारी वर्तुळात वर्तविली जात आहे.

आठवडीबाजारातही हल्लायवतमाळ येथील आठवडी बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता धक्का लागल्यावरून वाद घालत एकाने धारदार चाकूने वार केले. यात आकाश गौतम शिरसाट (रा. फुकटनगर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून राजू किसन वाघाडे (रा. पाटीपुरा) याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी