शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कुपटी नदीच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती.

ठळक मुद्देकौतुकास्पद कार्य : दारव्हा येथे गणेश विसर्जनानंतर निर्माल्य, प्लास्टिक गोळा करून विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातील गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली. नदीत आणि परिसरात घाण, प्रदूषण निर्माण होऊ नये याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तीन युवकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती. तसेच अनेकांच्या घरी श्री गणेश विराजमान झाले होते.उत्सवानंतर शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता जुन्या दिग्रस मार्गावरील कुपटी नदीवर व्यवस्था केली जाते. परंतु दहा दिवस अत्यंत धुमधडाका व भक्तीमय वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवात विसर्जनानंतर मात्र नदी व परिसराची दयनीय अवस्था होते. ही अवस्था बदलावी, याकरिता तीन युवकांनी पुढाकार घेतला. ते शिक्षणाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र कोरोनामुळे ते आपल्या घरी आहे.सुटीचा सदुपयोग करावा, या विचारात असताना विसर्जनानंतर नदी पात्रात होणारी घाण, प्रदूषण पाहून त्यांना ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ठाणेदार मनोज केदारे यांची भेट घेतली. त्यांनी या कार्याला प्रोत्साहन दिले. हे युवक विसर्जनाच्या दिवशी नदीवर सज्ज झाले. त्यांनी विसर्जनासाठी सार्वजनिक व घरगुती गणेशभक्तांकडून मूर्ती व्यतिरिक्त असणारे साहित्य घेऊन प्लास्टिक, निर्माल्य व इतर अशी वेगवेगळी विभागणी केली. निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली. नंतर कचरा नगरपालिकेच्या ताब्यात दिला. युवकांनी दिवसभर हजर राहून मेहनतीने हे कार्य पार पाडले. त्यांच्या नियोजनामुळे या ठिकाणी विसर्जन झाल्याचे कुणालाही वाटणार नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छतेसाठी या युवकांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरले आहे.पोलीस ठाण्यात तीनही युवकांचा गौरवयेथील ठाणेदार मनोज केदारे यांनी या युवकांना या कार्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यावतीने पोलीस ठाण्यात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन या युवकांचा गौरव करण्यात आला. प्लास्टिक, घाण, प्रदूषण ह्या आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. मूर्ती विसर्जनानंतर दरवर्षी नदी पात्र व परिसरात घाणीचे साम्राज्य राहत होते. यावर्षी मात्र युवकांनी स्वच्छतेचे फार मोठे कार्य पार पाडले. त्यांनी या माध्यमातून चांगला संदेश दिला, असे मत ठाणेदार केदारे यांनी व्यक्त केले. या गौरवामुळे कार्याचे चिज झाल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस