शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

कुपटी नदीच्या स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती.

ठळक मुद्देकौतुकास्पद कार्य : दारव्हा येथे गणेश विसर्जनानंतर निर्माल्य, प्लास्टिक गोळा करून विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरातील गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य, प्लास्टिक व इतर साहित्य गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आली. नदीत आणि परिसरात घाण, प्रदूषण निर्माण होऊ नये याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तीन युवकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.संकेतकुमार महेंद्र अघमे, हिमांशू शंकर इहरे आणि क्रितिक रमेश चव्हाण, अशी या युवकांची नावे आहे. त्यांच्या नियोजनामुळे दरवर्षी विसर्जनानंतर निर्माण होणारे चित्र यावर्षी बदलले. कोरोनाच्या संकटामुळे घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शासन, प्रशासनाने केले होते. त्याला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ३४ सार्वजनिक मंडळांपैकी २२ मंडळांनी अत्यंत छोट्या स्वरूपात श्री गणेशाची स्थापना केली होती. तसेच अनेकांच्या घरी श्री गणेश विराजमान झाले होते.उत्सवानंतर शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता जुन्या दिग्रस मार्गावरील कुपटी नदीवर व्यवस्था केली जाते. परंतु दहा दिवस अत्यंत धुमधडाका व भक्तीमय वातावरणात साजरा होणाऱ्या या उत्सवात विसर्जनानंतर मात्र नदी व परिसराची दयनीय अवस्था होते. ही अवस्था बदलावी, याकरिता तीन युवकांनी पुढाकार घेतला. ते शिक्षणाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मात्र कोरोनामुळे ते आपल्या घरी आहे.सुटीचा सदुपयोग करावा, या विचारात असताना विसर्जनानंतर नदी पात्रात होणारी घाण, प्रदूषण पाहून त्यांना ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ठाणेदार मनोज केदारे यांची भेट घेतली. त्यांनी या कार्याला प्रोत्साहन दिले. हे युवक विसर्जनाच्या दिवशी नदीवर सज्ज झाले. त्यांनी विसर्जनासाठी सार्वजनिक व घरगुती गणेशभक्तांकडून मूर्ती व्यतिरिक्त असणारे साहित्य घेऊन प्लास्टिक, निर्माल्य व इतर अशी वेगवेगळी विभागणी केली. निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली. नंतर कचरा नगरपालिकेच्या ताब्यात दिला. युवकांनी दिवसभर हजर राहून मेहनतीने हे कार्य पार पाडले. त्यांच्या नियोजनामुळे या ठिकाणी विसर्जन झाल्याचे कुणालाही वाटणार नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छतेसाठी या युवकांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरले आहे.पोलीस ठाण्यात तीनही युवकांचा गौरवयेथील ठाणेदार मनोज केदारे यांनी या युवकांना या कार्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यावतीने पोलीस ठाण्यात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन या युवकांचा गौरव करण्यात आला. प्लास्टिक, घाण, प्रदूषण ह्या आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. मूर्ती विसर्जनानंतर दरवर्षी नदी पात्र व परिसरात घाणीचे साम्राज्य राहत होते. यावर्षी मात्र युवकांनी स्वच्छतेचे फार मोठे कार्य पार पाडले. त्यांनी या माध्यमातून चांगला संदेश दिला, असे मत ठाणेदार केदारे यांनी व्यक्त केले. या गौरवामुळे कार्याचे चिज झाल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस