शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

यूपीएससीतील यशात आई-वडिलांच्या कष्टाचा मोठा वाटा- गिरीश बदोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 21:57 IST

उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला

उस्मानाबाद : कष्टकरी आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याची भावना गिरीश बदोलेनं व्यक्त केली. गिरीश बदोले यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आहे. गिरीशच्या या नेत्रदीपक यशामुळे दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या बदोले कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.  लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी गावचा गिरीश बदोले राज्यात पहिला आलाय. या उत्तुंग यशात आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याची भावना गिरीशनं व्यक्त केली. कसगी गावात बदोले यांची कोरडवाहू शेतजमीन आहे. याशिवाय त्यांचं कुटुंब इतरांची जमीनही कसायला घेतं. 'अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आई-वडिलांनी मोठं पाठबळ दिलं,' असं गिरीशनं सांगितलं. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी जितका अभ्यास महत्वाचा असतो, तितकंच वृत्तपत्रांचं वाचनही महत्वाचं असतं. माझ्या यशात वृत्तपत्रांचाही मोठा वाटा आहे, असं गिरीशनं म्हटलं. गिरीशचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तुळजापूरच्या सैनिकी विद्यालयातून झालं. त्यानंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईच्या जे.जे. मधून एमबीबीएसची पदवी मिळविली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, तरी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती, असं गिरीशनं 'लोकमत'शी बोलताना सांगितलं. अधिकारी होण्याची इच्छा आणि आई, वडिलांचं भक्कम पाठबळ मिळाल्यानंतर गिरीशनं २०१४ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणं सुरू केलं. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याला घवघवीत यश मिळालं. या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'दिवसातील १२ ते १५ तास अभ्यासाला द्यायचो. एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवून पुण्यात तयारी सुरू केली. सुरुवातीला अपयश आलं. पण खचलो नाही. पुन्हा जोमानं प्रयत्न केले,' असं गिरीशनं सांगितलं.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगYavatmalयवतमाळ