शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशहरात एकाच ठिकाणी हाेते पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यवतमाळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरविले जाणारे पाणी शुद्ध असते, असा या विभागाचा दावा आहे. खरेच शुद्ध पाणी घरातील नळापर्यंत येते काय, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. परंतु, अनेक ठिकाणी असलेले लिकेज, कर्मचाऱ्यांकडून कामे करताना होत असलेली दिरंगाई या व इतर कारणांमुळे काही भागात शुद्ध पाणी पोहोचण्याविषयी साशंकताच आहे. अगदी गटारांमधून पाईपलाईन गेलेल्या आहेत. काही ठिकाणी वाॅल्व्हमधून गटाराचे पाणी झिरपते आहे. तर काही ठिकाणी सम्पवरच आंघोळ करण्याचे प्रकार घडत आहेत. गाळयुक्त पाण्याची तर यवतमाळकरांना सवय झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असल्याचे सांगितले जाते.

प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुनेनागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

अशी हाेते तपासणीयवतमाळ शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण चापडोह आणि निळोणा फिल्टर प्लांटवरून होते. याठिकाणी दररोज पाच नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात.घेतलेले नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडे पाठविले जाते. तेथे इकोली बॅक्टेरिया आदी चाचण्या होतात. क्लोरिन तपासले जाते.

पिण्याच्या पाण्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. जेणेकरून नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचेल. पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी झाल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. शुद्ध पाणी मिळावे यासाठी खबरदारी घेण्यात येते.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा

 

टॅग्स :Waterपाणी