शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

यवतमाळकरांनो, तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशहरात एकाच ठिकाणी हाेते पाण्याच्या नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यवतमाळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पुरविले जाणारे पाणी शुद्ध असते, असा या विभागाचा दावा आहे. खरेच शुद्ध पाणी घरातील नळापर्यंत येते काय, हा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात. परंतु, अनेक ठिकाणी असलेले लिकेज, कर्मचाऱ्यांकडून कामे करताना होत असलेली दिरंगाई या व इतर कारणांमुळे काही भागात शुद्ध पाणी पोहोचण्याविषयी साशंकताच आहे. अगदी गटारांमधून पाईपलाईन गेलेल्या आहेत. काही ठिकाणी वाॅल्व्हमधून गटाराचे पाणी झिरपते आहे. तर काही ठिकाणी सम्पवरच आंघोळ करण्याचे प्रकार घडत आहेत. गाळयुक्त पाण्याची तर यवतमाळकरांना सवय झाली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असल्याचे सांगितले जाते.

प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुनेनागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचते आहे की नाही, यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या भागातून नियमितपणे पाण्याचे नमुने घेतले जात असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. फिल्टर प्लांटवरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पाण्याचीही तपासणी वेळोवेळी केली जाते. ज्या भागात पाणीपुरवठा सुरू आहे. त्या भागात कर्मचारी पोहोचून पाणी नमुने घेतात. याची तपासणी प्रयोगशाळेतून केली जाते. त्यांच्याकडून पाण्याविषयी साशंकता व्यक्त केल्यास आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

अशी हाेते तपासणीयवतमाळ शहराला होणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण चापडोह आणि निळोणा फिल्टर प्लांटवरून होते. याठिकाणी दररोज पाच नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात.घेतलेले नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडे पाठविले जाते. तेथे इकोली बॅक्टेरिया आदी चाचण्या होतात. क्लोरिन तपासले जाते.

पिण्याच्या पाण्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. जेणेकरून नागरिकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचेल. पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी झाल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. शुद्ध पाणी मिळावे यासाठी खबरदारी घेण्यात येते.- अजय बेले, उपविभागीय अभियंता, मजीप्रा

 

टॅग्स :Waterपाणी