शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

...म्हणून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली; लीलाबाईंनी सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:58 IST

बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले.

यवतमाळ : बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळातील मारवाडी चौकात गालबोट लागले. यावेळी आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितल्याने वाद निर्माण होऊन तणाव वाढला. काही आंदोलक एका दुकानात घुसले, त्यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या महिलेनं त्यांच्यावर मिरचीपूड टाकली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मिरची पावडर टाकणाऱ्या लीलाबाई रेखवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आहे. त्यावेळी त्यांनी सर्व घडलेला वृत्तांत कथन केला. लीलाबाईंशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली बातचीतप्रश्न: पोलिसांतर्फे तुमचा सत्कार करण्यात येणार आहे. तुमचं अभिनंदन. कसे वाटतंय ?उत्तर - चांगले वाटते मॅडम. असं राहायला पाहिजे. पोलिसांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. प्रश्न - सकाळी नेमकं काय घडलं ? मारवाडी चौकात तुमचं दुकान आहे. त्यावेळी काय झाले ?उत्तर - सकाळी आम्ही कामच करायला आलो होतो. दुकान नेमकेच उघडले होते. कलम चौकातून तीन - चारशे लोक आले आणि त्यांनी दुकान बंद करायला सांगितले. चार-पाच जण दुकानात शिरले. त्यांनी दगडफेक सुरू केली. सामानाची नासधूस केली. प्रश्न - तुमचं दुकान कशाचं आहे ?उत्तर - आमचं दुकान नाही. आम्ही तिथे कामाला आहोत. दुकान मारवाड्याची आहे. किशोर पोद्दार म्हणून. प्रश्न - नेमकं तिथे काय काय विकलं जातं उत्तर - सगळंच आहे. किराणा आहे. मिरची पावडर. मसाल्याचे पदार्थ.. तांदूळ धान्य वगैरे सगळं आहेप्रश्न - बरं, पुढे काय झालं. दोन - तिनशे लोकं तिथे आले. मग पुढे काय झालं?उत्तर - ते दुकानात आले. त्यांनी आमच्या मालकाला सांगितलं. आम्ही दोघंच होतो दुकानात. ते आतमध्ये शिरले. गोटे वगैरे मारायला सुरुवात केली. बाहेर मिरची वगैरे होती. मी तिथेच उभी होते. ते मिरचीची फेकफाक करायला लागले. आतमध्ये शिरायला लागले. ते मारहाण करायला लागले. ते खूप कल्ला करायला लागले. त्यांनी आमच्या मालकाला धरून वगैरे घेतलं होते. आम्ही दोघंच होतो. काय करावं सुचत नव्हतं. सोबत दोन पोलीस पण होते. पण ठीक आहे. करणार काय. एवढ्या लोकांमध्ये काय करायचं ते समजलंच नाही मॅडम. प्रश्न - मग त्यावेळी तुम्ही काय केलं ?उत्तर - मग ते आतमध्ये शिरले आणि त्यांनी मारहाण केली. मग आम्हीही त्यांच्यासमोरच कल्ला केला, मग थोड्या वेळानं पोलीस आले. त्यांनी लाठीचार्ज केला. मग ते सगळे पळून गेले.प्रश्न  - बरं, तुमचं दुकान त्यांना बंद का करायचं होतं? उत्तर - मॅडम ते आंदोलन काही तरी होतं. माहीत नाहीये. त्यांनी कुठलंच बंद केलं नाही. डायरेक्ट आमच्याच दुकानात आले. तेच समजले नाही. तिकडची सगळीच दुकानं उघडी होती. ते एकदम तिकडून आले आणि त्यांनी आमच्या दुकानावर धावा बोलला. ते का केलं हेच समजलं नाही मॅडम. मी बाहेरच उभी होते तेव्हा.प्रश्न - बरं तुम्ही त्यांना विचारलं नाही बंद का करायचं आहे दुकान ? उत्तर - विचारलं ना. आमच्या मालकांनी विचारलं. आमचं तुम्हाला समर्थन आहे, तुम्ही रॅली काढत आहात, आमचं समर्थन आहे त्याला. पण आम्ही दुकान का बंद करू? त्यानंतर आठ-दहा पोरं एकदम अंगावरच आली. एकदम मारायच्या पद्धतीनेच ते अंगावर धावले. गोटे वगैरे मारले. त्यांनी खूपच धिंगाणा केला. आता एवढ्या जणांसमोर आम्ही काय करू शकतो. आम्ही दोघंच जणं होतो दुकानात. प्रश्न - मग हातात मिरची पावडर घेऊन त्यांना पळवून लावायचं कसं सुचलं तुम्हाला ?उत्तर - काही सुधरलं नाही आम्हाला. आम्हाला जे सुधरलं ते आम्ही केलं. त्यांनी फेकफाक केली आमच्या मिरचीची, मिरची पावडर सगळी पसरून गेली होती. मग आम्हाला तेव्हाच हे सुचलं. आता त्यांनी हे सगळं फेकलं. आता तेच हातात घेऊन वापरू. आता एवढे लोकं अंगावर येत आहेत. आपण कसं काय करू म्हणून. मग तेच आम्हाला काहीच नाही सुधरलं. मग तेच आम्हाला सुचलं. आम्ही आपला जीव वाचवाचा हे करत होतो. प्रश्न - बरं तुम्ही मिरची पावडर टाकल्यानंतर ते सगळे तिथून निघून गेले का ? की ते परत आलेउत्तर - नाही, ते निघलेच नाही. पोलीस आले. तेव्हा त्यांनी त्यांना मारहाण केली. काहीही होऊ शकलं असतं मॅडम. आज काहीही होऊ शकलं असतं... प्रश्न - मग तुमच्यात एवढी मोठी हिंमत कशी आली ?उत्तर - आता अंगावर येताहेत म्हटल्यावर हिंमत येणारच ना मॅडम. काही तरी संघर्ष करावाच लागेल ना. एवढे लोकं एका दमाने.. चार-पाचशे लोक इकडून तिकडून घुसत होती. त्यात मी एकटी बाई. माझंही काहीही झालं असतं त्यात. माझ्या मालकाला तर धरूनच घेतलं होतं. त्याच्यात मी एकटीच होती तिथे. मी ओरडत होते पोलिसांना. वाचवा, वाचवा म्हणून.. पोलीस असूनही ते असं का करताहेत. त्याचा व्हिडीओपण बनवला कोणीतरी तिथे. मी बोलत होते तेथे "लेडिज के आंग पे कैसा हाथ डालरे. पोलीस होने के बावजूद ऐसा क्यूँ कर रहे हैं. हम को कुछ समझमें नहीं आया.  अब हमारी जान बचाने के लिए कुछ तो करना पडेगा ना".