शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात चार बालविवाह रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:37 IST

यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.

ठळक मुद्देबाल संरक्षण कक्ष नातेवाईकांचे समुपदेशन

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अज्ञान, रुढी परंपरा आदी कारणांनी बालविवाहाची कुप्रथा आजही काही भागात सुरू आहे. शासन बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी छुप्या पद्धतीने असे विवाह होत आहे. असेच यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.जिल्ह्यातील पिसगाव (मारेगाव), हेगडी (पुसद), भंडारी (आर्णी) आणि सावंगा (दिग्रस) येथे होऊ घातलेले बालविवाह पालकांचे मन वळवून थांबविण्यात आले. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचीही मदत घेण्यात आली. १८ वर्षाखालील मुलीचा आणि २१ वर्षातील मुलाचा विवाह करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. मात्र आजही काही समाजात बालविवाह करण्याची प्रथा कायम आहे. अज्ञान, रुढी परंपरा, अंधश्रद्धा आणि जोखीम यातून बालपणीच विवाह उरकले जातात. भटकंती करणाऱ्या समाजात मुलगी वयात आली की, तिचा विवाह उरकण्याची घाई होते. १३-१४ वर्षाची कोवळी पोरं विवाह बंधनात अडकून १६-१७ व्या वर्षी तिच्यावर मातृत्वही लादले जाते. अनेक कोवळ्या कळ्या अशा विवाहाने निस्तेज झाल्या आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने यासाठी प्रयत्न करीत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे होऊ घातलेला बालविवाह स्थानिक प्रशासन आणि कक्षाने रोखला. तसेच पुसद तालुक्यातील हेगडी, आर्णी तालुक्यातील भंडारी आणि दिग्रस तालुक्यातील सावंगा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

समुपदेशनात लागतो कसबालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली की, बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी त्या गावात पोहोचतात. कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा यांची समजूत काढतात. परंतु वर्षानुवर्षे असलेला पगडा जायला कठीण जाते. समुपदेशकांचाही कस लागतो. अनेकदा पोलिसी खाक्या आणि भीती दाखवून हा विवाह रोखला जातो. तसेच यानंतर बालविवाह करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले जाते.प्रगतीशील महाराष्ट्रात बालविवाह होणे ही शरमेची बाब आहे. शासन असे विवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे माहिती प्राप्त होताच पडताळणी करून खात्री केली जाते. त्यानंतर त्या कुटुंबाचे समूपदेशन करून हा विवाह रोखला जातो. असे विवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण समिती अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.- रवी आडेजिल्हा बालसंरक्षण अधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Crimeगुन्हा