शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

यवतमाळ जिल्ह्यात चार बालविवाह रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:37 IST

यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.

ठळक मुद्देबाल संरक्षण कक्ष नातेवाईकांचे समुपदेशन

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अज्ञान, रुढी परंपरा आदी कारणांनी बालविवाहाची कुप्रथा आजही काही भागात सुरू आहे. शासन बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी छुप्या पद्धतीने असे विवाह होत आहे. असेच यवतमाळ जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले. पालकांचे आणि नातेवाईकांचे समुपदेशन करून बालविवाहपासून त्यांना परावृत्त केले.जिल्ह्यातील पिसगाव (मारेगाव), हेगडी (पुसद), भंडारी (आर्णी) आणि सावंगा (दिग्रस) येथे होऊ घातलेले बालविवाह पालकांचे मन वळवून थांबविण्यात आले. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचीही मदत घेण्यात आली. १८ वर्षाखालील मुलीचा आणि २१ वर्षातील मुलाचा विवाह करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. मात्र आजही काही समाजात बालविवाह करण्याची प्रथा कायम आहे. अज्ञान, रुढी परंपरा, अंधश्रद्धा आणि जोखीम यातून बालपणीच विवाह उरकले जातात. भटकंती करणाऱ्या समाजात मुलगी वयात आली की, तिचा विवाह उरकण्याची घाई होते. १३-१४ वर्षाची कोवळी पोरं विवाह बंधनात अडकून १६-१७ व्या वर्षी तिच्यावर मातृत्वही लादले जाते. अनेक कोवळ्या कळ्या अशा विवाहाने निस्तेज झाल्या आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने यासाठी प्रयत्न करीत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे होऊ घातलेला बालविवाह स्थानिक प्रशासन आणि कक्षाने रोखला. तसेच पुसद तालुक्यातील हेगडी, आर्णी तालुक्यातील भंडारी आणि दिग्रस तालुक्यातील सावंगा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

समुपदेशनात लागतो कसबालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली की, बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी त्या गावात पोहोचतात. कुटुंबातील आई-वडील, आजी-आजोबा यांची समजूत काढतात. परंतु वर्षानुवर्षे असलेला पगडा जायला कठीण जाते. समुपदेशकांचाही कस लागतो. अनेकदा पोलिसी खाक्या आणि भीती दाखवून हा विवाह रोखला जातो. तसेच यानंतर बालविवाह करणार नाही, असे हमीपत्रही लिहून घेतले जाते.प्रगतीशील महाराष्ट्रात बालविवाह होणे ही शरमेची बाब आहे. शासन असे विवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. चाईल्ड लाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे माहिती प्राप्त होताच पडताळणी करून खात्री केली जाते. त्यानंतर त्या कुटुंबाचे समूपदेशन करून हा विवाह रोखला जातो. असे विवाह होत असल्यास जागरुक नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण समिती अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.- रवी आडेजिल्हा बालसंरक्षण अधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Crimeगुन्हा