शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

यवतमाळ जिल्हा; अखेर २९ शेतकऱ्यांना ७ लाखांची विमा भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:46 IST

दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यशदोन दिवसात रक्कम मिळणार

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दारव्हा तालुक्यात खरीप २०१७ चा पीकविमा मंजूर असताना आधार क्रमांक लिंक न केल्यामुळे २९ शेतकऱ्यांची अडकलेली सहा लाख ९३ हजार ८९६ रुपये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वरील रक्कम कंपनीकडून बँकेला प्राप्त झाली असून दोन दिवसात ती शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे.याविषयी सुरुवातीला कोणतीही हालचाल झाली नव्हती. विम्याच्या प्रीमियमची रक्कम परत करण्याचा पर्याय समोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु लोकमतने शेतकऱ्यांचा हा प्रश्न लावून धरल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा प्रशासनाने दखल घेत विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यानंतर आता त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारव्हा शाखेंतर्गत २२ ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यापैकी १९ संस्थांना नियमित कर्ज वाटप झाले. या संस्थांमध्ये ४८९ नियमित कर्जदार सभासद असून त्यांच्या ८५७.१९ हेक्टर क्षेत्रावर प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी विमा काढण्यात आला होता. संबंधित संस्थांनी विमा प्रस्ताव तयार करून बँकेला सादर केले. त्यापोटी येणारी १४ लाख ५८ हजार रुपये प्रीमियमची रक्कम संस्था कर्ज नावे करून बँकेच्या पीक विमा खात्यात वर्ग करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या वतीने नियमित सभासदांचे कामकाज ऑफलाइन पोर्टलवर करण्यात आले. परंतु १० ग्राम विकास विविध कार्यकारी संस्थेमधील ३० सभासदांची यादी बँकेत सादर करताना आधार कार्ड क्रमांक सोबत न दिल्यामुळे ऑफलाइन पोर्टलवर ती नावे स्वीकारली नाही. परंतु या सभासदांच्या प्रीमियमची रक्कम मात्र विमा कंपनीकडे जमा होती. यामधील २९ सभासद पीक विमा भरपाईस पात्र असून त्यांची नुकसान भरपाईची रक्कम सहा लाख ९३ हजार ८९६ एवढी असल्याचा अहवाल देखील बँकेच्या जिल्हा कार्यालयाला पाठविण्यात आला होता.परंतु तरीसुद्धा कंपनीकडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नव्हती. लोकमतने हा विषय उचलून धरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. कंपनीने राज्य शासन व केंद्र शासनाचा भरपाईचा हिस्सा मिळण्याकरिता त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. दरम्यान बँकेचा पाठपुरावा चालूच होता. शासनाकडून प्रस्ताव मंजूर होऊन आल्यानंतर कंपनीने भरपाईची रक्कम बँकेकडे वर्ग केली.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरणअडकलेली पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची सूचना केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी या प्रश्नाची दखल घेत यासाठी स्वतंत्र बैठक घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंतराव घुईखेडकर, प्रकाश मानकर व प्रा शिवाजी राठोड यांनीसुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला. परंतु बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करून महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व घडामोडीचे वृत्त लोकमत मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या प्रयत्नाला गती आली. त्यामुळेच न्याय मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून विम्याची रक्कम मंजूर झाल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी