शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

यवतमाळ ग्राहक आयोगाचा एसबीआय इन्शुरन्सला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:20 IST

Yavatmal : सर्वेक्षण अहवाल पुरेसा; त्या आधारे भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कागदपत्र नसले तरी सर्वेक्षण अहवाल आहे, त्यामुळे त्याच आधारावर भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक बसली असून, विम्याची संरक्षित रक्कम ८ लाख ४१ हजार ७६० रुपये अदा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

पुसद येथील अर्चना सतीश रहांगडाले यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि. नागपूरकडे भरपाईसाठी दावा दाखल केला. मात्र, कंपनीने मागितलेली कागदपत्रे सादर न केल्याचे कारण देत भरपाई नाकारली आणि प्रकरण बंद केले. आयोगाने मात्र सर्वेक्षण अहवाल पुरेसा असल्याचे नमूद करत विमा कंपनीला संपूर्ण भरपाई अदा करण्याचे आदेश दिले.

ग्राहक आयोगात तक्रारएसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने दावा नाकारल्यामुळे अर्चना रहांगडाले यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान कंपनीने आपली बाजू मांडताना, तक्रारकर्त्यांनी कागदपत्र सादर केले नाही. तांत्रिक कारणामुळे विमा दावा बंद करण्यात आला, असा युक्तिवाद करण्यात आला. ही बाब अनुचित व्यापार प्रथा ठरते, असे आयोगाने नमूद केले.

अंतरिम अहवाल ठरला महत्त्वाचाएसबीआय जनरल इन्शुरन्सच्या सर्वेक्षकांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केल्यानंतर अंतरिम अहवाल तयार केला असेल यानुसार देय असलेली रक्कम अदा करणे गरजेचे होते. परंतु विरुद्ध पक्षाने तसे काहीही केले नाही. त्यांचा विमा दावा फेटाळून ग्राहक म्हणून सेवा देण्यात कसूर केला, असे आयोगाने आपल्या निकालपत्रात नमूद केले आहे.

संरक्षित रक्कम द्यावीअपघातग्रस्त चारचाकी वाहनाचा दुरुस्ती खर्च कंपनीकडून २४ लाख ४५ हजार ८६४ रुपये सांगण्यात आला होता. मात्र, संरक्षित रक्कम आठ लाख ४१ हजार ७६० रुपये आहे. ही संपूर्ण रक्कम अर्चना रहांगडाले यांना देण्यात यावी, असा आदेश एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला आयोगाने दिला आहे. कंपनीने मागितलेले कागदपत्र दिले नाही म्हणून तक्रारकर्त्यांना शारीरिक, मानसिक त्रासाची रक्कम मंजूर करणे योग्य ठरणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ