शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार का? - अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 05:45 IST

उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्षांनी सुनावले : साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याची खंत

प्रज्ञा केळकर-सिंग/ स्नेहा मोरे 

यवतमाळ : झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? असा सवाल करीत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समाजशक्तीने उचलली पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, अशा कठोर शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरूनच सुनावले.

डॉ. वि .भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेच्या वतीने आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे सुपूर्द केली. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उद्घाटन समारंभातही उमटले. देशमुख यांनी सहगल यांच्या नियोजित भाषणातील काही उतारे वाचून दाखवत आयोजकांवर निशाणा साधला. तर डॉ. ढेरे यांनीही खडे बोल सुनावले.

संमेलन हा उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाङमयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत, याची गंभीर जाणीव असायला हवी होती. संमेलनाचे उद्घाटन करताना शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला वैशाली येडे, डॉ. अरुणा ढेरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी.नाक कापले गेले - विनोद तावडेनयनतारा प्रकरणाने महाराष्ट्राचे नाक कापले गेले आहे. याचे सरकारलाही दु:ख झाले आहे, असे सांगून तावडे म्हणाले, संमेलनातजे व्हायला नको, तेच घडले. याबाबतीत अनेक मते मांडली गेली. नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करणे ही बाब सरकारलाही आवडलेली नाही. संमेलनाला सरकार केवळ अनुदान देते. उद्घाटक कोण असावा, संमेलनात कोणी सहभागी व्हावे, यात सरकार हस्तक्षेप करत नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ