शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार का? - अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 05:45 IST

उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्षांनी सुनावले : साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याची खंत

प्रज्ञा केळकर-सिंग/ स्नेहा मोरे 

यवतमाळ : झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? असा सवाल करीत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समाजशक्तीने उचलली पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, अशा कठोर शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरूनच सुनावले.

डॉ. वि .भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेच्या वतीने आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे सुपूर्द केली. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उद्घाटन समारंभातही उमटले. देशमुख यांनी सहगल यांच्या नियोजित भाषणातील काही उतारे वाचून दाखवत आयोजकांवर निशाणा साधला. तर डॉ. ढेरे यांनीही खडे बोल सुनावले.

संमेलन हा उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाङमयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत, याची गंभीर जाणीव असायला हवी होती. संमेलनाचे उद्घाटन करताना शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला वैशाली येडे, डॉ. अरुणा ढेरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी.नाक कापले गेले - विनोद तावडेनयनतारा प्रकरणाने महाराष्ट्राचे नाक कापले गेले आहे. याचे सरकारलाही दु:ख झाले आहे, असे सांगून तावडे म्हणाले, संमेलनातजे व्हायला नको, तेच घडले. याबाबतीत अनेक मते मांडली गेली. नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करणे ही बाब सरकारलाही आवडलेली नाही. संमेलनाला सरकार केवळ अनुदान देते. उद्घाटक कोण असावा, संमेलनात कोणी सहभागी व्हावे, यात सरकार हस्तक्षेप करत नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ