शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:25 PM

तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देद्वारकाबाईची व्यथा : पिकाला तिलांजली देऊन पाजले ग्रामस्थांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील परजना-उमरठा येथे पाणीटंचाई पाचविलाच पुजलेली आहे. त्यामुळे उमरठा येथील विधवा शेतकरी महिला व्दारकाबाई नथ्थूजी पाढेन यांच्या शेतातील विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ग्रामपंचायत उमरठा, पंचायत समिती नेर व तहसीलदारांच्या संयुक्त मागणीवरून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहीत करण्यात आली. त्यापोटी मोबदला देण्याचे ठरले. मागीलवर्षी याच विहिरीवरून परजना गावाला पाणीपुरवठा केला गेला. त्यांनी पिकाचे ओलित बाजूला सारून गावकºयांना पाणी पाजले. त्यांच्या नशीबी पाण्याच्या मोदबल्यासाठी भटकंतीची वेळ आली.व्दारकाबार्इंना एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा मोबदला मिळाला. मात्र परजना गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवीत असतानाही त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी पाणी बंद करून पिकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी पुरवठा प्रशासनाने त्यांच्या विहिरीवरील पाणीपुरवठा बंदच करू दिला नाही. परिणामी १ जुलै २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यत याच विहिरीवरून परजनाला पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शेतात कोणत्याच पिकाचे ओलित करता आले नाही. या पाणीपुुरवठा मोबदल्यासाठी आता व्दारकाबाई ही विधवा शेतकरी महिला प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विहिरीवरून अद्यापही परजना गावाला पाणीपुरवठा सुरूच आहे.पाढेन कुटुंबावर उपासमारीची वेळगावकºयांना पाणी पाजायचे असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी व्दारकाबाई यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. प्रशासनाने पाण्याचाही मोबदला दिला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थाांना पाणी देऊन मी कोणता गुन्हा केला, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता त्यांनी मूख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे मोबदल्याची मागणी केली आहे.